शिर्डी साई संस्थानकडे तब्बल ५१४ किलो सोनं! कुठे आहे एवढं सोनं? सीईओ गाडीलकरांनी दिली माहिती

शिर्डी : जगभरात प्रसिद्ध असलेल्या शिर्डीतील साईबाबांच्या चरणी अखंड भक्तीभावाने दान करणाऱ्या भक्तांमुळे शिर्डी साईबाबा संस्थान हे देशातील सर्वात संपन्न धार्मिक संस्थांपैकी एक मानलं जातं. याच संस्थेकडे सध्या ५१४ किलो सोनं असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.


त्यांनी सांगितलं की, या ५१४ किलो सोन्यापैकी निम्मं सोनं रोजच्या पूजाविधी, सिंहासन, मुकुट, हार यांसाठी वापरलं जातं. उर्वरित सोनं मंदिर परिसरातील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षितरीत्या ठेवण्यात आलं आहे.



सोन्याची नाणी करण्याचा प्रस्ताव न्यायप्रविष्ट


२०२१ मध्ये १५५ किलो सोनं वितळवून १, २ व ५ ग्रॅमची नाणी तयार करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला परवानगी मिळाल्यानंतर २०२३ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली, मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. गाडीलकर यांनी स्पष्ट केलं की, हा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे.



भक्तांकडून दानाचा ओघ सुरुच


साई संस्थान दरवर्षी कोट्यवधींचं दान स्वीकारतं. यामध्ये रोकड, मौल्यवान दागदागिने यांचा समावेश असतो.


विशेष म्हणजे, नुकतंच दुबईहून आलेल्या एका भाविकाने २७० ग्रॅम सोन्याचं 'ॐ साई राम' नाव मंदिरात अर्पण केले आहे.


शिर्डी साई संस्थानचं हे सोने मंदिरासाठी केवळ संपत्ती नव्हे, तर भाविकांच्या श्रद्धेचं आणि समर्पणाचं प्रतीक आहे.

Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.