बीड जिल्ह्यात उलथापलाथ, एकाचवेळी ६०६ पोलिसांच्या बदल्या

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात मोठी उलथापालथ झाली आहे. जिल्ह्यातील ६०६ पोलिसांची एकाचवेळी बदली करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू वाल्मिक कराड याच्यावर गंभीर आरोप झाले. नंतर वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटक झाली. बीड जिल्ह्यातील पोलिसांच्या भोंगळ कारभाराच्या अनेक बातम्या आल्या. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील ६०६ पोलिसांच्या बदल्यांचे आदेश एकाचवेळी काढण्यात आले आहेत. याआधी सरपंच हत्येप्रकरणी काही पोलिसांचे निलंबन झाले आहे. निलंबनाच्या कारवाईनंतर काही काळ बीडमध्ये पोलीस दलात काही बदल झाले नव्हते. पण आता एकदम मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

बीड पोलीस दलातील शिपाई ते पोलीस उपनिरीक्षक या पदांवरच्या ६०६ पोलिसांच्या बदल्यांचे आदेश एकाचवेळी काढण्यात आले आहेत. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली आहे. महिन्याभरात बदल्यांच्या अंमलबजावणीचे काम पूर्ण होईल. सर्व अधिकारी - कर्मचारी नव्या जबाबदारीवर नियुक्त होतील. संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून एकाच पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. यातील काही पोलिसांचे स्थानिक गुन्हेगारांशी संबंध होते. त्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढली होती.
Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Sugar hoarding : साखरेच्या साठेबाजीला आळा; केंद्र सरकारकडून स्टॉक लिमिट २ हजार क्विंटलवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर