खरीप हंगामासाठी पैसे शिल्लक नसल्याने शेतकरी झाले हतबल

लक्ष्मण सोनवणे


बेलगाव कुऱ्हे : भाताचे आगार समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या खरीप हंगाम नियोजनासाठी जमीन मशागतीच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली मात्र पुढील नियोजनासाठी पैसे शिल्लक नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. शेतीसाठी लागणारी नांगर, वखर, सारायंत्र, तीपण, पाबर, कोळप आदी पारंपरिक औजारे कारागिरांकडून बनवली जात होती मात्र आता त्या पद्धतीचे गावोगावी कारागीर राहिले नसल्याने शेतकरी आधुनिक यांत्रिकरणाकडे वळला आहे.


महागाईमुळे औजाराना देखील अडीच ते तीन हजार खर्च येत असल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारे नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. काळाच्या ओघात शेतकरी आधुनिक शेतीकडे वळला ट्रॅक्टरच्या माध्यमातून मशागत करण्यासाठी अडीच ते तीन हजार भाव एकरला मोजावे लागतात. काही आदिवासी भागात शेतजमीनीची मशागत पारंपरिक पद्धतीने केली जाते. भाताचा तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या तालुक्याच्या महसुली गावात अनेक शेतकरी पावसाळ्यात भात लागवड करतात मे च्या शेवटच्या आठवड्यात खरीप हंगामाच्या जोरदार तयारीसाठी जमीन दुरुस्ती, मशागतीची कामे केली जातात. मात्र अवकाळीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांकडे जमीन दुरुस्तीसाठी पैसेच नसल्याने हतबल झाले आहेत. अशातच बाजारात मशागतीची औजाराना मागणी वाढली असून एखाद्या योजनेची अंमलबजावणी करावी असे शेतकऱ्यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून अनियमित पावसामुळे गेल्या काही वर्षांपासून शेतीची अनेक कामे रखडली गेली जात आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायावर अनेक विपरीत परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतात भरपूर उत्पादन होण्यासाठी ते पूर्व मशागतीची नांगरट, मोघडणीची कामे करतात मात्र शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडल्याने शेतमशागतिकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने एन वेळेला पाहू, निघेल काहीतरी मार्ग कदाचित असाच विचार शेतकरी करीत असावा असे चित्र इगतपुरी तालुक्यात पहावयास मिळत आहे.


पिण्यासाठी पाणी आणि जनावरांसाठी चारा मिळावा यासाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरू आहे. घेतलेल्या बागाईत पिकालाही कवडीमोल भाव व अवकाळीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. खरीप पेरणीसाठी पैसे उपलबध नसल्याने गरीब शेतकरी सैरभैर झाला आहे. बी बियाणे कोळपणी नांगरणी करण्यासाठी शासनाने एकरी वीस हजाराची सरसकट आर्थिक मदत करावी. विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कर्ज पुरवठा करावा.
- योगेश सुरुडे, व्हाईस चेअरमन देवळे विविध कार्यकारी सोसायटी

Comments
Add Comment

Nashik Crime : एटीएसच्या नावाने ‘डिजिटल अरेस्ट’, नाशिकच्या मॅनेजरची ९० लाखांची फसवणूक

Nashik Crime : नाशिकमध्ये सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हेगारांनी स्वतःला एटीएस आणि मुंबई

Nashik : गणेशोत्सवापूर्वी नाशिक पोलिस ॲक्शन मोडमध्ये ! नाशिकमध्ये मुक्काम असलेल्या तडीपार गुन्हेगारांची ‘धरपकड’ मोहीम

Nashik : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नाशिक पोलीस ॲक्शन मोडमध्ये

Nashik Crime : समृद्धी महामार्गावरील दरोड्याप्रकरणी सात जण ताब्यात, ५ फरार आरोपींचा शोध सुरू

Nashik Crime : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

Nashik News : समृध्दी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, लुटीच्या घटनांनंतर पोलीस सतर्क

Nashik News : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

Ashok Kharat Case : पीडित स्त्रियांवर...अशोक खरातच्या आज सुनावणीत न्यायालयात काय घडलं ?

Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने सर्वानाच हादरवून सोडले होते. भविष्य सांगण्याचा बहाणा करत भोंदू

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने