मुसळधार पावसाला पुन्हा सुरुवात, राज्यात कुठे आणि किती पाऊस पडणार ?

मुंबई : राज्यात दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुढील काही दिवसांनी म्हणजेच दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात जास्त पाऊस पडल्यामुळे काही भागात लोकांचं प्रचंड नुकसान झालंय. तरी ही विदर्भात अजूनही पाऊस पडला नसल्याने तेथील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पुण्यात ऑरेंज अलर्ट तर मुंबईत यलो अलर्ट जारी करण्यात आला. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.


पुण्यातील इतर भागात ही शनिवारी ढगाळ वातावरण होते, परंतू संध्याकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने दोन दिवसात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.  हवामान विभागाच्या अंदाजानुसार रत्नागिरी, पुणे जिल्ह्याचा घाटमाथा इथं तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. पालघर, ठाणे,मुंबई, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर, सातारा जिल्ह्याचा घाटमाथा इथं तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर इथं तुरळक ठिकाणी वीजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.


विदर्भातील अनेक जिल्हे कोरडे असल्याने विदर्भातील शेतकरी मात्र पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पाऊस न पडल्यामुळे अकोल्यात पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं आहे. विदर्भातील अद्यापही तापमान कमी झालेलं नाही. पावसाअभावी धरणांमधील पाणीसाठाही कमी झाला आहे.  नागपूरमध्ये तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या वर आहे. ज्या भागात पाऊस झाला तिकडे जवळपास 13 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, उर्वरित शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. महत्वाचे म्हणजे आता ज्यांनी पेरणी केली ते शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसलेत.






 

 
Comments
Add Comment

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर