आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन


मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून तिसऱ्या क्रमांकावर येणार असून त्याची जबाबदारी येणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवरच निर्भय असून त्यात भावी अधिकाऱ्यांचे मोठे योगदान असेल. आपल्या अंगभूत गुणांनी तसेच अभ्यासपूर्ण कृतीतूनच हे ध्येय आपल्याला साध्य करता येईल, असा मूलमंत्र माजी मंत्री व खासदार नारायण राणे यांनी दिला.


युवा उत्थान फाऊंडेशनच्या वतीने सुशासनाचे प्रशासक या यूपीएससी परीक्षेतील गुणवंतांचा गौरव सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी भावी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सर्वप्रथम नारायण राणे व इतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर काही मोजक्या गुणवंतांनी आपल्या खडतर प्रवासाचे अनुभव सांगितले. युवा उत्थान फाऊंडेशन व नरेडकोचे पदाधिकारी अमोल गवळी, प्रशांत शर्मा, अनिता गवळी यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम २०१६ पासून आयोजित केला जातो.


नारायण राणे पुढे म्हणाले की, येणाऱ्या काळात भारत हा अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर जाणार असून त्यासाठी आपल्या देशाचा जीडीपी कशाप्रकारे वाढवता येईल त्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्यांनी संविधान, कायदे यांचा अभ्यास करून आपल्या देशाचे उत्पन्न कसे वाढवता येईल, यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यामुळे जनतेलाही त्याचा फायदा पोहोचून आपल्या देशाचे नाव उंचावण्यास त्यामुळे मदत होईल व त्यासाठी सातत्यपूर्ण वाचन, चौफेर नजर आपण आत्मसात करावी. आपले व आपल्या देशाचे नाव मोठे करावे. एक अधिकारीपद म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी नको तर समाजासाठी काहीतरी ते करणारे असावे. तसेच कोणतेही काम भावनेच्या भरात करू नये तर संविधान व कायद्याच्या कसोटीत राहूनच सर्व करावे, असा सल्लाही नारायण राणे यांनी दिला.


आजच ठरवा की जे निर्णय घ्याल ते १४० कोटी जनतेच्या उत्कर्षासाठी असतील. अधिकारी बनला की चाल बदलते, ती बदलू नका. तुमच्यातली माणुसकी कायम ठेवा. पदाचा दुरुपयोग करू नका. पदाचा मान वाढवा, त्यामुळेच तुमचाही मान वाढेल असेही त्यांनी नमूद केले. नैतिकता स्वीकारावी. भविष्यात देश घडेल, त्यात तुमचे मोठे योगदान असेल असे नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.


यावेळी व्यासपीठावर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन सुरक्षा व नियोजन विभागाचे महाव्यवस्थापक राजेंद्र उपनवर, यू.पी.एस.सीचे माजी अध्यक्ष डॉ. डी. पी. अगरवाल, राज्य गुप्तचर विभागाचे सहआयुक्त रवींद्र शिसवे, सिप्झ विकासाचे सहआयुक्त मयूर मानकर, राजेश दोषी आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.