कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, खासदार नारायण राणे यांचा इशारा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या सर्व रस्त्त्यांची डागडुजी व दुरुस्तीची कामे तत्काळ पूर्ण करा. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशारा खासदार नारायण राणे यांनी दिला आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित होते.


खासदार नारायण राणे यावेळी म्हणाले की, पावसाळ्यामुळे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्डे पडल्याने लोकांना वाहन चालवताना खूप त्रास होतो आहे. अनेक ठिकाणी खड्यांमुळे अपघात होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रस्त्यांची तत्काळ दुरुस्तीची गरज आहे. दुरुस्तीचे काम मानकानुसार (नॉम्र्स) होईल याची दक्षता घ्या. जिल्ह्यातील अनेक साकव नादुरुस्त झालेले आहेत. हे साकव देखील प्राधान्याने दुरुस्ती करावेत, जेणेकरून नागरिक आणि विद्याध्यांची गैरसोय होणार नाही. साकांबाबत नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत, असे काम करा. नवीन साकव बांधत असताना त्याची गुणवत्ता तपासून ते उत्कृष्ट असतील, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश खा. नारायण राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.



मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे तातडीने भरा; 'त्या' ठेकेदाराला नोटीस काढा


गणेशोत्सव सण जवळ आला आहे. महामार्ग व त्यावरील खड्डे तातडीने कसे भरता येतील व महामार्ग सुस्थितीत ठेवता येईल याचे नियोजन करावे. जो ठेकेदार याला जबाबदार आहे, त्याला नोटीस काढा. निकृष्ट दर्जाचे हे काम झाले असून त्यावावत ठेकेदाराला जवाबदार धरा, असे आदेश खासदार नारायण राणे यांनी या बैठकीत दिले. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे अपघातामुळे बळी व जखमीची सख्या वाढत आहे. यावायत खासदार राणे यांनी गंभीर दखल घेतली. त्या ठेकेदाराला तातडीने नोटीस काढा. खड्डे भरून सुस्थितीत मार्ग करा, असे आदेश त्यांनी दिले. या महामार्गावर पडलेल्या खड्डयांकडे महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून वाहनांना अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या महामार्गावर पाणी साचल्याने खड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे हा महामार्ग धोकादायक बनला आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा