आठ लाख झोपडपट्टीधारकांचे बायोमेट्रिक पाच महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश

निर्धारित वेळेत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे प्राधिकरणासमोर आव्हान


मुंबई  :  मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लाखो कुटुंबांची झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) पात्रता निश्चिती अधिक पारदर्शकपणे करण्यासाठी बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हे काम निर्धारित वेळेत पूर्ण करणे हे प्राधिकरणासमोर एक मोठे आव्हान आहे. आगामी पाच महिन्यांत तब्बल ८ लाख झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्याचे लक्ष्य प्राधिकरणाने ठेवले आहे.


आतापर्यंत मुंबईतील एकूण १३ लाख ७९ हजार ०८६ झोपड्यांपैकी केवळ ५ लाख ७५ हजार १३६ झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. याचा अर्थ अजूनही ८ लाख ३ हजार ९५० झोपड्यांमधील सर्वेक्षण बाकी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.


यामुळे झोपु प्राधिकरणासमोर पाच महिन्यांत उर्वरित मोठ्या संख्येने झोपडीधारकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आव्हान आहे.या मोठ्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी झोपु प्राधिकरणाने कंबर कसली आहे. बायोमेट्रिक सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नवीन निविदा काढण्यात आल्या आहेत जेणेकरून कामाला गती मिळेल.झोपडीधारकांच्या पात्रता निश्चितीत पारदर्शकता आणण्यासाठी २०१६ मध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षणाचा निर्णय घेण्यात आला होता.


मुंबईतील २५९७ झोपडपट्ट्यांमधील १० लाख ७८ हजार ७४६ झोपड्यांचे ड्रोन सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर २०२१ मध्ये प्रत्यक्ष बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सुरुवात झाली. मात्र, एका संस्थेच्या कामामुळे काही अडचणी आल्या होत्या. सध्या ८ लाख २२ हजार ८४३ झोपड्यांचे क्रमांकन पूर्ण झाले आहे. झोपडीधारकांचे योग्य सहकार्य मिळवण्यासाठी प्राधिकरणाने जनजागृती मोहिमेवरही भर दिला आहे. पाच महिन्यांत ८ लाख झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करणे हे निश्चितच एक मोठे आव्हान आहे, परंतु प्राधिकरण हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या सर्वेक्षणातून झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती मिळेल आणि पात्र झोपडीधारकांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर