'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींवर टीका केली. 'बिहारमध्ये निवडणूक आयोगाने केलेल्या एसआयआरला विरोध म्हणून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी यात्रा काढली. यात्रेद्वारे निवडणूक आयोगाच्या कामाला विरोध केला. नेमक्या शब्दात सांगायचं तर राहुल गांधींनी बिहारमध्ये घुसखोर वाचवा यात्रा काढली. काँग्रेसला मतांसाठी भारतीयांवर विश्वास नाही, ते घुसखोरांवर विसंबून आहेत. यासाठी त्यांना देशात घुसखोर हवे आहेत. काँग्रेस घुसखोरांना वाचवत आहे;' असा घणाघात अमित शाह यांनी केला.

मतं मिळावी यासाठी काँग्रेसला भारताच्या मतदारयादीत घुसखोर हवे आहेत. ते घुसखोरांच्या बळावर निवडणुका जिंकू इच्छितात. तर भाजप एसआयआर आणि मतदार याद्या स्वच्छ करण्याच्या मोहिमेला पाठिंबा देत आहे. भारताची सुरक्षा, एकात्मता आणि विकास याला भाजप प्राधान्य देते आणि देणार. मोदी सरकारने आतापर्यंत ११ वर्षांत राष्ट्रीय सुरक्षा,भारताचा विकास, मतदार यादी सुधारणा, कलम ३७० या विषयांना प्राधान्य दिले. भारताच्या अर्थचक्राला गती दिली. देशाचा वेगाने विकास करण्याला भर दिला. जीएसटीद्वारे कर व्यवस्था आधुनिक तसेच सोपी केली. जीएसटी सवलतींद्वारे सामान्यांना दिलासा दिला. देशाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर मनमोकळी आणि पारदर्शक अशी चर्चा केली; असेही अमित शाह म्हणाले.

मित शाह यांनी सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि अलिकडच्या ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. ते म्हणाले की, मोदी सरकारच्या काळात लष्कराने पाकिस्तानला त्यांच्या घरात घुसून चोख प्रत्युत्तर दिले. घुसखोरीचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांशी चर्चा केली. हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, सोमनाथ मंदिराचा विकास आणि कर्तारपूर साहिब कॉरिडॉर असे ऐतिहासिक प्रकल्प केले.

काश्मीरमधून कलम ३७० हटवणे हा भाजपचा दीर्घकाळचा संकल्प होता, जो मोदी सरकारने पूर्ण केला आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी घेतलेला निर्णय ऐतिहासिक होता आणि देशाची अखंडता मजबूत करणारा होता. मोदी सरकार कायमच भारताची सुरक्षा, एकात्मता आणि विकास यासाठी काम करत आहे आणि करत राहणार; असे अमित शाह म्हणाले.
Comments
Add Comment

Uzbekistan 30 Days Visa Free Entry : भारतीय पर्यटकांसाठी मोठी खुशखबर! उझबेकिस्तानमध्ये ३० दिवस व्हिसामुक्त प्रवास

नवी दिल्ली : परदेशात फिरण्याचा प्लॅन करणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी मोठी खुशखबर आहे. उझबेकिस्तानने भारतीय

PM Selfie Video : भारताचा विकास दर ७.८%; पंतप्रधान मोदींकडून नागरिकांचे अभिनंदन, म्हणाले- ‘ही आपल्या सामूहिक शक्तीची ओळख’

नवी दिल्ली : भारताने आर्थिक विकासाच्या बाबतीत दमदार कामगिरी करत आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के

Earthquake News : भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के; जम्मू-कश्मीर, सिक्कीमसह अफगाणिस्तानातही सलग हादरे

नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी भारतासह अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. १ सप्टेंबर

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान