PM Selfie Video : भारताचा विकास दर ७.८%; पंतप्रधान मोदींकडून नागरिकांचे अभिनंदन, म्हणाले- ‘ही आपल्या सामूहिक शक्तीची ओळख’

नवी दिल्ली : भारताने आर्थिक विकासाच्या बाबतीत दमदार कामगिरी करत आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के जीडीपी वाढ नोंदवली आहे. या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे अभिनंदन केले. जागतिक स्तरावरील संघर्ष, पुरवठा साखळीतील अडथळे आणि आर्थिक अनिश्चिततेच्या परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असल्याचे मोदी यांनी म्हटले. (PM Selfie Video)


इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या ७.८ टक्के विकास दराचे श्रेय देशातील नागरिकांच्या मेहनतीला आणि सामूहिक शक्तीला दिले. कोविड-१९ महामारीनंतर जगभरातील परिस्थिती आव्हानात्मक राहिली. अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती, पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि आर्थिक संकटे निर्माण झाली. मात्र, या सर्व अडचणींवर मात करत भारताने विकासाचा वेग कायम ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले. (GDP Rate)



देशाने आता ही गती कायम ठेवण्याची गरज असून त्यासाठी आत्मनिर्भर भारतावर भर देणे आवश्यक असल्याचे मोदी यांनी म्हटले.





‘स्वदेशी’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’चा मंत्र


पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना ‘स्वदेशी’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’चा मंत्र अंगीकारण्याचे आवाहन केले. मनोरंजनासाठी परदेशात प्रवास करणे किंवा परदेशात विवाहसोहळे आयोजित करण्याऐवजी भारतातच पर्यटन आणि विवाहसोहळ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे त्यांनी म्हटले. ( Indian Economy)


तसेच अत्यंत आवश्यक नसल्यास सोने खरेदी करणे टाळावे, असे आवाहनही मोदी यांनी केले. आत्मनिर्भरतेवर अधिक भर दिल्यास देशाच्या तरुण पिढीच्या हातात विकसित भारत सोपवण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ( Economic Growth)



उत्पादन आणि सेवा क्षेत्राची दमदार कामगिरी


सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपी ७.८ टक्क्यांनी वाढला. या कालावधीत नाममात्र जीडीपी वाढ १०.३ टक्के नोंदवली गेली.


मार्च तिमाहीतील ८.७ टक्क्यांच्या तुलनेत जून तिमाहीत सकल मूल्यवर्धित (GVA) वाढ ८.२ टक्के राहिली. उत्पादन क्षेत्राची वाढ मागील वर्षीच्या याच कालावधीतील ८.३ टक्क्यांवरून ९.२ टक्क्यांवर पोहोचली.


सेवा क्षेत्रानेही चांगली कामगिरी केली असून वित्तीय, स्थावर मालमत्ता आणि आयटी सेवा क्षेत्रात १२.१ टक्के वाढ नोंदवली गेली. तर कृषी क्षेत्राची वाढ ३.६ टक्के राहिली.


जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि बाह्य आव्हाने असतानाही भारताचा विकास दर अपेक्षेपेक्षा अधिक राहिल्याने भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही महत्त्वाची कामगिरी मानली जात आहे. ()

Comments
Add Comment

Earthquake News : भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के; जम्मू-कश्मीर, सिक्कीमसह अफगाणिस्तानातही सलग हादरे

नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी भारतासह अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. १ सप्टेंबर

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा