मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी

मुंबई  : केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २४०० कोटी रुपयांच्या मढ-वर्सोवा पूल प्रकल्पासाठी पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. पियूष गोयल यांनी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. मढ-वर्सोवा पुलामुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून ५ मिनिटांवर येणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.


या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाच्या परवानगीची प्रतीक्षा होती. राज्य सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला असून केंद्र सरकारकडे या प्रकल्पाच्या पर्यावरणीय मंजुरीसाठी शिफारस केली होती. त्यानुसार अखेर प्रकल्पाला तत्त्वतः पर्यावरणीय मंजुरी दिली आहे. विविध परवानग्यांअभावी या प्रकल्पाचे काम रखडल्यामुळे केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पियूष गोयल यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्यांकरीता पाठपुरावा केला होता. पर्यावरणाचे सर्व आवश्यक संरक्षणात्मक उपाय सुनिश्चित करून या महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पाची अमलबजावणी जलदगतीने पूर्ण करावी, अशा सूचना गोयल यांनी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


मुंबईकरांसाठी २२ किमीचे अंतर आता ५ मिनिटांत


मढ-वर्सोवा पूल प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्ये
१. प्रवासाच्या वेळेत कमी : प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून फक्त ५ मिनिटांत होईल.
२. अंतर २२ किमीवरून १.५ किमीवर कमी होईल.
३. लांब अंतर पार करण्याची किंवा नौका चालनाची आवश्यकता नष्ट करण्यासाठी थेट
४. रस्त्याचा संपर्क


५. पश्चिम मुंबईत निर्बाध प्रवासासाठी आगामी वर्सोवा-भायंदर तटीय रस्त्याशी एकत्रीकरण.
६.प्रवासाचे अंतर आणि वेळकमी होईल.
७.हजारो प्रवासी, स्थानिक मच्छीमार आणि पर्यटकांना फायदेशीर ठरणार.
८.स्थानिक व्यवसायांना फायदा होईल तसेच रोजगाराच्या संधी निर्माण होतील.


या प्रकल्पामुळे पायाभूत सुविधांमध्ये बदल


मढ-वर्सोवा ब्रिज प्रकल्पामुळे मढ द्वीपापासून वर्सोवा पर्यंतचा प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून ५ मिनिटांवर येणार आहे. वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवास सुखकर होईल. या प्रकल्पामुळे महानगरातील नागरिकांना आधुनिक, कार्यक्षम आणि भविष्यातील आवश्यकतांसाठी तयार सार्वजनिक सुविधांचा लाभ मिळेल. याशिवाय, दहिसर-भायंदर तटीय रस्ता प्रकल्प, मलाड क्षेत्रात समुद्र किनाऱ्याच्या रस्त्याशी जोडणारे तीन पूल आणि रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २२०० रुपये कोटींचा प्रकल्प, ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पामुळेही पायाभूत सुविधांमध्ये मोठा बदल
घडवून आणेल.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.