भाजप-राष्ट्रवादीची युती, एकनाथ शिंदे पडले एकाकी!

बदलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून मागील पाच वर्षापासून प्रलंबित असलेल्या कुळगाव - बदलापूर नगरपरिषद निवडणुकीत आपल्याच पक्षाची सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.


गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पाच वर्षे एकत्र नांदलेल्या सेना-भाजप युतीमधील अंतर्गत वादाला ग्रहण लागले आहे. बदलापुर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महायुती फूट पडली असून भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युती जाहीर केल्याने एकनाथ शिंदे गटाला एकाकी पाडले आहे.


दोन्ही पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी युती नकोच, असे स्पष्टपणे सांगत असताना दोन्ही पक्षांतील वरिष्ठ पातळीवरील नेते मात्र युती ठेवण्याबाबत अजूनही अनुकूल असलेले दिसतात. त्यातच भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत युती जाहीर केल्याने अंतर्गत वाद आणखी चिघळला आहे.


पुढची पाच वर्षे आपलीच सत्ता मिळवण्यासाठी सेना-भाजपचे नेते एकमेकांच्या समोर आता सरसावले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीत दोन्ही पक्ष युतीसाठी एकत्र येण्यास तयार नाहीत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही पक्षांना एकमेका विरोधात दंड थोपटले आहेत.


महाविकास आघाडीची अद्याप कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. मागील लोकसभा निवडणुकीत तत्कालीन खासदार कपिल पाटील यांच्यावर मतदार नाराज होते. त्यामुळे मतदारांना बदल पाहिजे होता. त्यातच काही त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी पाहिजे, तशी मदत न केल्याने लोकांना बदल असलेल्या लाटेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार बाळू मामा म्हात्रे हे निवडून आल्याचे बोलले जाते. मात्र त्यानंतर खासदार म्हात्रे यांनी देखील बदलापूरकडे दुर्लक्ष केल्याचे समजते. बदलापूरच्या आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ मिळाल्यास त्यांना फायदा होऊ शकतो.



२०१५ च्या निवडणुकीतील पक्ष बलाबल


२०१५ मध्ये कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत ४७ जागांसाठी मतदान झाले होते. त्यामध्ये शिवसेनेला २४ जागा , भाजपाला २० जागा , राष्ट्रवादीला दोन जागा आणि अपक्ष एक अशी पक्षीय बलाबल होते. त्यावेळी भाजपा आणि सेनेची युती होती .


त्यानंतर २०२० मध्ये कोरोना असल्याने निवडणूक रखडल्या होत्या . तब्बल पाच वर्षे या निवडणूक प्रलंबित राहिल्या. मात्र आता पुन्हा सर्व पक्षाचे कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागेल आहेत. त्यातच जनतेतून नगराध्यक्ष होणार असल्याने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणार आहे. सद्यस्थितीत तरी नगराध्यक्ष पदासाठी भाजपाला अनुकूल वातावरण असल्याची चर्चा आहे.

Comments
Add Comment

Thane Crime : ठाणे ग्रामीण भागात शाळेतील कर्मचाऱ्यावर विनयभंगाचा आरोप; २२ अल्पवयीन विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर अटक

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यावर २२ अल्पवयीन विद्यार्थिनींनी

Duleep Trophy Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं शतक अवघ्या ८ धावांनी हुकलं; सचिनचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी गमावली

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) दमदार फलंदाजी करत सर्वांचे

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा

Earthquake News : भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के; जम्मू-कश्मीर, सिक्कीमसह अफगाणिस्तानातही सलग हादरे

नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी भारतासह अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. १ सप्टेंबर

Nanded Accident : सहस्त्रकुंड धबधबा पाहून परतताना काळाचा घाला; जीप झाडावर आदळली, 3 भाविकांचा मृत्यू

नांदेड : सहस्त्रकुंड धबधबा आणि महादेव मंदिराचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतणाऱ्या भाविकांच्या जीपचा नांदेड