पाण्याची गळती आणि दुषित पाणी समस्येवर लक्ष द्या, आयुक्तांचे जल अभियंता विभागाला निर्देश

मुंबई : मुंबई उत्तर मुंबईतील पाण्याच्या समस्येबाबत महापालिका आयुक्तांसोबतच लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत वाढीव पाण्याचे नियोजन करणे शक्य नसले तरी या भागांतील दुषित पाणी पुरवठा आणि जलवाहिनीची गळती या दोन समस्या प्राधान्याने सोडवण्याच्या निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी दिले आहेत. पाण्याच्या गळती दुरुस्तीसाठी आवश्यक असल्यास गळतीचा शोध घेत रस्ता तथा पदपथ खोदण्याची परवानगी तातडीने दिली जावी, जेणेकरून गळती दुरुस्तीची कामे त्वरीत होवून नागरिकांना पाण्याचा पुरवठा सुरळीत होईल,असे त्यांनी स्पष्ट केले.


दहिसर ते मालाड या भागातील पाणी समस्येबाबत उत्तर मुंबई लोकसभेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी चार दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांसोबत झालेल्या आढावा बैठकीत आपल्या स्तरावर लोकप्रतिनिधींची एक बैठक घेवून ही समस्या निकालात काढण्याचा प्रयत्न करावा असे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी उत्तर मुंबईतील लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीला भाजपाचे आमदार योगेश सागर, मनिषा चौधरी, संजय उपाध्याय यांच्यासह उत्तर मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष बाळा तावडे, गणेश खणकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.


या बैठकीत उत्तर मुंबईसह पश्चिम उपनगरातील पाणी समस्येवर चिंता व्यक्त करण्यात आली. पश्चिम उपनगराची लोकसंख्या वाढत असतानाही या भागाला पाण्याचा पुरवठा फारच कमी आहे, त्यातुलनेत शहरात लोकसंख्या कमी होत असतानाही तेथील पाणी पुरवठा कमी झालेला नाही. त्यामुळे पाणी पुरवठ्यात असमानता असून लोकसंख्येनुसार समानता आणली जावी अशी मागणी भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी केली. परंतु, मुंबईची पाण्याची मागणी आणि पुरवठा यामध्येच तफावत असल्याने असे करता येणार नाही हे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. त्यामुळे अखेर तात्पुरती व्यवस्था म्हणून दुषित पाण्याची समस्या आणि गळती दुरुस्ती यावर तातडीने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल,असे आश्वासन दिले. त्यामुळे जलावहिन्यांमधील गळतीची तातडीने दुरस्ती केली जावी, यासाठी खोदकाम करावे लागत असल्यास त्याला तातडीने परवानगी दिली जावी असे निर्देश आयुक्तांनी दिले आहे. तसेच दुषित पाण्याची समस्याही तातडीने हाती घेवून ती निकालात काढण्यावर भर दिला जावा, जेणेकरून या परिसरातील नागरिकांना होत असलेल्या पाणी समस्या निकालात काढली जाईल,असे आयुक्तांनी जलअभियंता विभागाला निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११