कणकवली नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचारात पालकमंत्री नितेश राणेंची एन्ट्री

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विरुध्द शहर विकास आघाडी अशी लढत आहे. निवडणुकीचे वातावरण तापले असतानाच मत्स्य व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीच्या प्रचारात एन्ट्री घेतली आहे. खुद्द पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली शहरातील व्यापारी , डॉक्टर , वकील, पत्रकार , प्रतिष्ठित नागरिक यांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे.


कणकवली येथील व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर , डॉ. निलेश पाकळे , बापू पारकर , सुशील पारकर , डॉ. अनंत नागवेकर , मालपेकर यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांशी पालकमंत्री नितेश राणे यांनी संवाद साधला.


यावेळी ही निवडणूक कणकवलीला विकासाकडे नेणारी आहे. केंद्र आणि राज्य सरकार हे भाजपचे आहेत. त्यामुळे कणकवलीतील सुज्ञ नागरिक म्हणून भारतीय जनता पार्टी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे आणि नगरसेवकांना मतदान करा. दुस-या टप्प्यातील विकास करण्याची जबाबदारी माझी आहे, असा शब्द देत विश्वास देण्याची भूमिका पालकमंत्री नितेश राणे वैयक्तिक गाठीभेटीमध्ये मांडत आहेत.


Comments
Add Comment

Bad Breath Remedies :तोंडाची दुर्गंधी कायमची पळवून लावा! करा हे अत्यंत सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Trendy Earrings for Traditional Look : पारंपरिक कार्यक्रमात घाला हे ट्रेंडी कानातले; तुमचा लूक दिसेल आणखी सुंदर आणि स्टायलिश!

मुंबई : लग्नसराई, सण-समारंभ किंवा कोणताही पारंपरिक कार्यक्रम म्हटलं की महिलांना आपल्या लूकमध्ये काहीतरी खास

Leftover Rice Recipe : आता उरलेला भात कधीच वाया जाणार नाही! घरातच बनवा चटपटीत राईस कुरकुरे; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खुश

तुम्हीही रात्रीचा किंवा दुपारचा उरलेला भात शिळा झाला म्हणून फेकून देण्याच्या विचारात आहात

Nashik Kumbhmela : कुंभमेळा संपूर्ण मानवजातीचा, गोदावरी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे - निवृत्ती महाराज इंदुरीकर

Nashik : समुद्रमंथनातून प्राप्त अमृताचे थेंब चार ठिकाणी पडले, त्यापैकी चौथा थेंब नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पडल्याने