निवडणूक रणधुमाळीमध्ये बुलढाण्यात गोंधळ; बोगस मतदाराला नागरिकांकडून चोप

बुलढाणा : राज्यात सुरू असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात एक बोगस मतदार पकडल्याची घटना समोर आली. नागरिकांनी या तरुणाला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र काही क्षणातच हा बोगस मतदार पोलिसांच्या हातातून निसटल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.


घटनेदरम्यान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये कुणाल गायकवाड हे पकडलेल्या तरुणाचा बचाव करताना, तसेच उपस्थित पोलिसांशी उध्दट वर्तन करताना दिसत आहेत. कुणाल यांनी पोलिसांना धमकावत बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.


दरम्यान, राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आता पुढे ढकलण्यात आले आहेत. नामनिर्देशन प्रक्रियेत काही तांत्रिक कारणे आणि प्रलंबित अपीलांमुळे काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे आता २१ डिसेंबर रोजी राज्यातील सर्व नगरपरिषद-नगरपंचायतींचे निकाल जाहीर होणार आहेत.

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी