वंदे मातरमला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत चर्चा

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत एक विशेष चर्चा आयोजित केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राज्यसभेत वंदे मातरम या विषयावरील चर्चेला सुरुवात करतील. यानंतर सत्ताधारी आणि विरोध गटातील निवडक सदस्यांना चर्चेत भाग घेण्याची संधी मिळणार आहे.

केंद्र सरकारचा हेतू वंदे मातरमचा इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील त्याची भूमिका आणि त्याची सांस्कृतिक आणि राष्ट्रीय प्रासंगिकता यावर चर्चा करणे हा आहे. शिवाय, १९३७ मध्ये काँग्रेस पक्षाने काढून टाकलेल्या काही ओळींवरून मुख्य विरोधी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी मागील काही दिवसांपासून वंदे मातरमवरून काँग्रेस पक्षावर सतत टीका करत आहेत. वंदे मातरम संदर्भातल्या एका कार्यक्रमात मोदी म्हणाले की, १९३७ मध्ये काँग्रेसने वंदे मातरम मोडून देशाच्या फाळणीचे बीज पेरले. पंतप्रधानांनी याला काँग्रेसचे तुष्टीकरणाचे धोरण म्हटले. म्हणूनच, आज जेव्हा या मुद्द्यावर चर्चा होईल तेव्हा दोन्ही बाजू एकमेकांवर तीव्र राजकीय हल्ले करताना दिसण्याची शक्यता आहे. याआधी १ ऑक्टोबर २०२५ रोजी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक भूमिकेला लक्षात घेऊन 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात उत्सव साजरे करण्यास मंजुरी दिली.
Comments
Add Comment

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?

Gold Silver Rate Today : PM मोदींचे 'ते' आवाहन अन् सोन्या-चांदीचे भाव गडगडले! चांदी थेट 'इतक्या' हजारांनी स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

मुंबई : परदेशी चलनावरील वाढता दबाव कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारपेठेत संतुलन राखण्यासाठी पंतप्रधान

Uzbekistan 30 Days Visa Free Entry : भारतीय पर्यटकांसाठी मोठी खुशखबर! उझबेकिस्तानमध्ये ३० दिवस व्हिसामुक्त प्रवास

नवी दिल्ली : परदेशात फिरण्याचा प्लॅन करणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी मोठी खुशखबर आहे. उझबेकिस्तानने भारतीय

PM Selfie Video : भारताचा विकास दर ७.८%; पंतप्रधान मोदींकडून नागरिकांचे अभिनंदन, म्हणाले- ‘ही आपल्या सामूहिक शक्तीची ओळख’

नवी दिल्ली : भारताने आर्थिक विकासाच्या बाबतीत दमदार कामगिरी करत आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के

Earthquake News : भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के; जम्मू-कश्मीर, सिक्कीमसह अफगाणिस्तानातही सलग हादरे

नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी भारतासह अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. १ सप्टेंबर