मुंबईत रोहिंग्यांविरोधात 'कोम्बिंग ऑपरेशन'; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधान परिषदेत घोषणा

नागपूर : मुंबईतील जमिनींवर भूमाफियांच्या मदतीने रोहिंग्या मुसलमानांचे बेकायदेशीर वास्तव्य आणि बांधकामे वाढत असल्याचा गंभीर मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला. यावर राज्य सरकारने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईत आता रोहिंग्यांविरोधात 'कोम्बिंग ऑपरेशन' (Combing Operation) राबवण्यात येईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत केली.



आमदार प्रसाद लाड यांनी वेधले लक्ष


विधान परिषदेचे कामकाज सुरू असताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे रोहिंग्यांचा मुद्दा उपस्थित केला. लाड यांनी सभागृहात धक्कादायक माहिती देताना सांगितले की, "मुंबईतील मोक्याच्या जमिनींवर काही भूमाफिया सक्रिय झाले आहेत. हे माफिया बेकायदेशीरपणे जमिनी बळकावून तिथे रोहिंग्यांचे पुनर्वसन करत आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहिली असून, ही बाब मुंबईच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहेत."



सरकारची तत्काळ दखल, ड्रोनद्वारे होणार सर्वेक्षण


प्रसाद लाड यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, हा विषय अत्यंत संवेदनशील असून सरकार याकडे गांभीर्याने पाहत आहे.



मंत्री योगेश कदम यांनी केल्या चार महत्त्वाच्या घोषणा


१. कोम्बिंग ऑपरेशन: मुंबईतील ज्या भागांमध्ये रोहिंग्यांचे वास्तव्य असल्याचा संशय आहे, तिथे पोलिसांमार्फत तातडीने 'कोम्बिंग ऑपरेशन' राबवले जाईल.


२. संयुक्त कारवाई: ही कारवाई केवळ एका विभागाची नसून, 'गृह विभाग' आणि 'वन विभाग' (Forest Department) संयुक्तपणे मोहीम राबवतील.


३. ड्रोन सर्व्हे: दाट वस्तीच्या किंवा दुर्गम भागात लपलेल्या अनधिकृत झोपड्या शोधण्यासाठी आधुनिक ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर करून सर्वेक्षण केले जाईल.


४. अतिक्रमण हटाव: सर्वेक्षणानंतर आढळलेली सर्व बेकायदेशीर बांधकामे आणि अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात येतील.


विधान परिषदेत मिळालेल्या या आश्वासनामुळे मुंबईतील अवैध घुसखोरीवर लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी