निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना 'दे धक्का'; तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश, अमित साटम यांच्या उपस्थितीत सोहळा

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मुंबईत जबर धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या घोसाळकर कुटुंबातील सदस्य आणि माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. दादर येथील 'वसंत स्मृती' कार्यालयात मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला


फेब्रुवारी २०२४ मध्ये पती आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्हदरम्यान निर्घृण हत्या झाली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या कठीण काळातून सावरत असतानाच तेजस्वी घोसाळकर यांनी आता राजकीय कारकीर्दीची नवी दिशा निश्चित केली आहे. त्या २०१७ मध्ये प्रभाग क्रमांक १ मधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर त्या भाजपचे प्राबल्य असलेल्या मुंबई बँकेवर संचालक म्हणून कार्यरत होत्या, तेव्हापासूनच त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु होती.




 

भावूक पत्रातून मांडली भूमिका:


भाजप प्रवेशापूर्वी तेजस्वी यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पत्र लिहित आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणतात, "अभिषेकच्या हत्येनंतर माझे आयुष्य बदलले. दोन लहान मुले आणि जनतेची जबाबदारी पेलताना मला अनेकदा कोसळून पडल्यासारखे झाले. सध्याच्या काळात काम करण्यासाठी आणि अडचणींवर मात करण्यासाठी मला एका खंबीर ताकदीची गरज आहे. केवळ पदासाठी नव्हे, तर मुलांच्या भविष्यासाठी आणि लोकांच्या सेवेसाठी मी हा निर्णय घेत आहे." या निर्णयाने उत्तर मुंबईत ठाकरे गटाला मोठे खिंडार पडल्याचे मानले जात आहे.

Comments
Add Comment

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

CM Devendra Fadnavis : 'भाजप कार्यकर्त्यांनी फेक नरेटिव्हविरुद्ध लढण्यास सज्ज व्हावे'

पुणे : काँग्रेसने माओवादापासून स्फूर्ती घेत खोटेनाटे सांगत देशात अराजक माजवण्याचा विडा उचलला आहे.

CM Devendra Fadnavis : 'CJP म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, चार-पाच तरुण केवळ मोहरे'

पुणे : ‘सीजेपी’ या नावामागे केवळ छोटीशी संघटना नसून, हा ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री

Eknath Shinde : मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट

मुंबई : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त

Tamil Nadu Politics : TVK च्या राजकीय मोहिमेमुळे काँग्रेस अस्वस्थ

चेन्नई : तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वातल्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण सत्ताधारी

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण