अंबरनाथ, बदलापूरच्या विकासाला चालना देणार, पुढच्या चार महिन्यात मेट्रो १४ चे काम सुरू होणार


अंबरनाथ : मुंबई महानगर क्षेत्रात दोन लाख कोटींची कामे सुरू आहेत. मेट्रोच्या नेटवर्कच्या माध्यमातून अंबरनाथ, बदलापूर ही शहरे जोडली जाणार आहेत. कांजुरमार्ग ते बदलापूर या मेट्रो १४ चे काम येत्या चार महिन्यात सुरू होणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत बोलत होते. मेट्रो ५, १२, १४ चा फायदा अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये राहणाऱ्यांना होणार आहे; असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


मुंबई महानगर क्षेत्राचा विकास करायचा आहे. अंबरनाथ शहरासाठीही माझे स्वप्न आहे. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आमच्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले.


राज्यात २ डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान झाले आहे. आता २० डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी दुसऱ्या टप्प्याचे मतदान आहे. मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आधी एकाच टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी निवडणूक घेण्याचे जाहीर केले होते पण २ डिसेंबरच्या मतदानाला दोन दिवस उरले असताना निवडणूक दोन टप्प्यात घेण्याची घोषणा करण्यात आली. वेळापत्रकात दुरुस्ती करण्यात आली. यामुळे अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलली गेली. ही निवडणूक पुढे गेली म्हणूनच अंबरनाथला येता आले असे मुख्यमंत्री म्हणाले.


अंबरनाथ हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. भाजपचा विकासाचा अजेंडा सांगण्यासाठी इथे आलो आहे, मी कुणावरही टीका करण्यासाठी आलेलो नाही, असे सांगत फडणवीस यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच आपण शिवसेनेवर टीका करणार नाही हे स्पष्ट केले. यावेळी बोलताना रेल्वे, मेट्रो प्रकल्पांची माहिती देत त्याचा अंबरनाथ, बदलापूरला फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कल्याण बदलापूर तिसरी चौथी मार्गिका झाल्यास दर दहा मिनिटाला लोकल मिळेल, असेही फडणवीस म्हणाले. सर्व साध्या लोकल वातानुकूलीत करण्यासाठी २३८ रॅक्सची मागणी करत आहोत. लवकरच सर्व लोकल कोणत्याही भाडेवाढीविना वातानुकूलीत होतील, असेही फडणवीस म्हणाले.


अंबरनाथमध्ये भाजपने नगराध्यक्ष पदाचा युवा आणि सुशिक्षित उमेदवार दिला आहे. त्या सनदी लेखापाल आहेत. त्या सर्व हिशोब ठेवतील आणि सर्वांचा हिशोब करतीलही, असे फडणवीस यावेळी म्हणाले. भाजप उमेदवारांची स्वप्ने ही माझे स्वप्ने असून ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


फक्त नगराध्यक्ष नाही तर नगरसेवकही निवडून द्यायला हवेत, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक, आमदार किसन कथोरे, कुमार आयलानी, सुलभा गायकवाड, चित्रा वाघ, माजी मंत्री कपिल पाटील यांच्यासह भाजपचे उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते.


Comments
Add Comment

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच

Thane Crime : ठाणे ग्रामीण भागात शाळेतील कर्मचाऱ्यावर विनयभंगाचा आरोप; २२ अल्पवयीन विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर अटक

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यावर २२ अल्पवयीन विद्यार्थिनींनी

Duleep Trophy Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं शतक अवघ्या ८ धावांनी हुकलं; सचिनचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी गमावली

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) दमदार फलंदाजी करत सर्वांचे

Western Railway New Timetable : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; जाणून घ्या नवीन बदल

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा अविभाज्य भाग असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवांमध्ये १ सप्टेंबर

Kalwa Hospital News : कळवा रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणात झुरळ? संतापाची लाट; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

ठाणे : ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णाला देण्यात आलेल्या जेवणात झुरळ आढळल्याचा