मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार


मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या अंगात शंभर हत्तीचे बळ आल्याचे बोलले जात आहे. परंतु, ज्यांनी मनसेची साथ सोडून उबाठामध्ये प्रवेश केला, त्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे. ज्या मनसेवर टिका केली आणि तेथील वर्तणुकीमध्ये पक्ष सोडत उबाठा गटाची साथ धरली. त्या मनसेची मदत आता कशी घेतली जाणार, असाही सवाल उपस्थित होत आहे. त्यातच मनसेतून उबाठा गटात गेलेल्यांना उमेदवारी देवू नये, याबाबत राज ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.


मनसेची स्थापना झाल्यानंतर शिवसेनेतील अनेकांनी त्या पक्षात प्रवेश देत राज ठाकरेंची साथ दिली. परंतु, २०१७ नंतर मनसेची ताकद मुंबईत कमी होवू लागल्यानंतर तसेच पक्ष संघटना वाढवण्याकडे कल नसल्याचे दिसून आल्यानंतर अनेकांनी मनसेची साथ सोडली. यामध्ये वांद्र्यातील अखिल चित्रे, बोरीवलीतील चेतन कदम, नितीन नांदगावकर, किर्तीकुमार शिंदे, धारावीतील हर्षला मोरे, जोगेश्वरी गोरेगावमधील सुगंधा शेट्ये आदींनी उबाठा गटामध्ये मनसेला सोडून उबाठा गटात प्रवेश केला आणि उबाठा गटातून कामाला सुरुवात केली. परंतु, आता मनसेच एकत्र आल्यामुळे पक्ष सोडून उबाठात गेलेल्यांचे काय होणार?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


अखिल चित्रे, सुगंधा शेट्ये, हर्षला मोरे तसेच चेतन कदम यांची पत्नी आता इच्छुक उमेदवारांच्या चर्चेत आहे. त्यामुळे आता जिंकण्यासाठी ही मंडळी मनसेची मदत कशी घेणार आणि आपला पक्ष सोडून जात आपल्याच पक्षावर नाराजी व्यक्त करणाऱ्यांना मनसैनिक कशी मदत करणार हाही प्रश्न उपस्थित होत आहे. या मनसेतून उबाठात आलेल्यांमुळे उबाठातील प्रस्थापितांच्या जागा गेल्या आहेत. त्यामुळे आधी मनसेला जागा सोडल्यामुळे नाराजी आहेतच त्यात मनसेतून आलेल्यांना उबाठाकडून तिकीट दिले जात असल्याने ही नाराजी तळाला अधिकच वाढली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उबाठामध्ये मनसेतून गेलेल्यांना तिकीट देवून नये किंवा त्यांना तिकीट दिल्यास आम्ही मतदान करणार नाही किंवा त्यांना मदतही करणार नाही, अशा प्रकारचे वातावरण तयार होण्याची दाट शक्यता असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे मनसेतून उबाठात गेलेल्यांना उमेदवारी देवू नये, अशा प्रकारच्या सूचना आता राज ठाकरे यांच्याकडून दिल्या जातात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.