ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण करण्यात आली आहे. या ठाकरे बंधूंच्या युतीमुळे उबाठा शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्या दिलजमाई झाल्याचे चित्र रंगवले असले तरी प्रत्यक्षात तळाला दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते मनाने एकत्र आल्याचे दिसून येत नाही. वरळीतील डोममध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर जर युतीची घोषण केली असती तर आजच्या घडीला दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मन जुळली असती. परंतु राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उबाठाच्या शाखांसह कार्यक्रमांमध्ये सहभागी न होण्याच्या सूचना देण्यात आल्याने अजुन तरी मनसैनिक आणि उबाठा सैनिक मनाने एकत्र न आल्याने याचा परिणाम येत्या निवडणुुकीत दिसून येणार आहे.



उबाठाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळीतील पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे दोन्ही पक्ष युतीमध्ये निवडणूक लढवतील. याचा परिणाम आगामी महापालिका निवडणुकीत होईल अशाप्रकारचे वातावरण निर्माण केले जात आहे. परंतु उबाठा सैनिक या युतीसाठी आग्रही असल्या तरी मनसैनिकांच्या मनाला ही युती पटलेली नाही. काही मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही भावांचे१८ वर्षांनंतर मनोमिलन झाले होते, त्याच कार्यक्रमात जर दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा झाली असती तर आजपर्यंत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हे एकदिलाने काम करू शकले असते. परंतु दोन भावांच्या मनोमिलनानंतर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी गुप्त संदेश देत पदाधिकारी आणि नेत्यांना उबाठाच्या शाखांसह कार्यक्रमांमध्ये न जाण्याचे कळवले होते. त्यामुळे मनसैनिकांमध्ये प्रचंड संभ्रम पसरला होता.



काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार तर युतीची घोषणा आधी झाली असती, एव्हाना दोन्ही पक्षांचे कार्यक्रम संयुक्तपणे होवू शकले असते. परंतु आता निवडणुकीच्या मतदानाला २० दिवस असताना दोन्ही पक्षांची युती झाल्याने कार्यकर्त्यांची मने जुळायला हा अवधी कमी आहे. त्यामुळे युतीची घोषणा लांबवल्यामुळे दोन्ही पक्षांचा प्रभावशील परिणाम म्हणावा तेवढा दिसून येणार नाही.

या युतीमुळे जे जुने शिवसैनिक आहेत ते आणि ज्यांचा गुजराती,मारवाडीसह इतरांवर राग आहेत, ते आनंद व्यक्त करताना दिसतील आणि ते मतदान करतील. मनसैनिक शिवसेेनेच्या उमेदवाराला मतदान करतील किंवा मन लावून काम करेल असे चित्र नसेल. त्यामुळे या युतीचा फायदा उबाठा शिवसेनेला होणार नसून याचा फायदा झाला तर राज ठाकरे यांच्या मनसे पक्षालाच अधिक होईल,अशीही शक्यता तळागाळातून व्यक्त होताना दिसत आहे.
Comments
Add Comment

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव