बंडखोरी टाळण्यासाठी काँग्रेस आणि राशपचे आस्ते कदम, जाहीर केली पहिली यादी


मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मुंबई महापालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० डिसेंबर पर्यंतचा कालावधी आहे. अतिशय कमी वेळ उरला असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या दोन्ही पक्षांनी मुंबईसाठीची उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.





मुंबई महापालिकेतील २२७ पैकी ६२ जागांवर वंचित लढेल आणि उर्वरित जागांवर काँग्रेस किंवा त्यांच्या सहमतीने मित्र पक्ष लढतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले आहे. या घोषणेनुसार उर्वरित १६५ पैकी ८७ जागांसाठी काँग्रेसने उमेदवार जाहीर केले आहे. काँग्रेसचे आणखी उमेदवार पुढील काही तासांत जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने फक्त सात उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.



काँग्रेस - वंचित आघाडीचे सूत्र कळल्यापासून खासदार वर्षा गायकवाड नाराज असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुंबईसाठीची ८७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने आतापर्यंत ९१ उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने ३७, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सात, समाजवादी पक्षाने २१ आणि आम आदमी पार्टीने ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उबाठाने आतापर्यंत ४२ जणांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे.





काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी








राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी




Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : 'CJP म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, चार-पाच तरुण केवळ मोहरे'

पुणे : ‘सीजेपी’ या नावामागे केवळ छोटीशी संघटना नसून, हा ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Eknath Shinde : मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट

मुंबई : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त

India Semicon 2.0 Scheme : भारताची 1.27 लाख कोटींची सेमीकॉन योजना

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात चिप निर्मितीच्या संपूर्ण यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी 1.27 लाख कोटी रुपये