दिव्यांग शिक्षकांना निवडणुकीची ‘ड्युटी’

शिक्षक संघटनाची नाराजी


मुंबई : दिव्यांग शिक्षकांना निवडणूकसंदर्भात कोणतेही कामकाज देऊ नये, असे आदेश असताना त्यांना मुंबई महापालिकेने निवडणुकीच्या कामकाजाचे आदेश दिल्याने शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच काही शिक्षकांनी आपल्या संस्थाचालकांकडे व महापालिका प्रशासनाकडे आजारी असल्याचे कागदपत्र सादर केलेले असतानाही त्यांनाही या संदर्भातले आदेश आल्याने यावर आयोगाने तातडीने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून केली जात आहे.मुंबई आणि परिसरातील शिक्षकांना महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत ‘बीएलओ’ म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांपैकी दिव्यांग आणि आजारी शिक्षकांचा समावेश आहेत. त्यांना या निवडणूक कामकाजातून सूट द्यावी, अशी मागणी पुरोगामी शिक्षक संघटनेकडून करण्यात आली आहे.दरम्यान, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आदी जिल्ह्यांमध्येही दिव्यांग आणि आजारी असलेल्या शिक्षकांना तसेच महिला शिक्षकांना निवडणुकीचे कामे देऊ नये, अशी मागणी यापूर्वीच महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेकडून करण्यात आली होती; त्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांमध्ये काही शिक्षकांना दिलासा मिळाला असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.