मुंबईत महायुतीमधील बंडोबांना थंड करण्यासाठी समन्वयकांची नियुक्ती

अर्ज मागे घेण्याचा उद्याचा शेवटचा दिवस; निष्ठावंत कार्यकर्त्यांना खुद्द मुख्यमंत्र्यांनी केले फोन


मुंबई : अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई पालिका निवडणुकीत बंडखोरांनी डोकेदुखी वाढवली असताना, महायुतीने बंडोबांना थंड करण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. मुंबईतील सहा जिल्ह्यांत समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत मतफुटी रोखणे, एकमेकांच्या (भाजप-शिवसेना) उमेदवारांच्या प्रभागात मतदान वाढवणे आणि महायुतीच्या एकजुटीचे दर्शन घडवणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. उद्या(२ जानेवारी) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने समन्वयकांपुढे जास्तीत जास्त बंडखोरी थोपवण्याचे आव्हान आहे.


भाजपकडून मुंबईतील सहा जिल्ह्यांत (प्रत्येक जिल्ह्यासाठी एक प्रमुख समन्वयक आणि त्यांना सहाय्यक समन्वयक) या नेमणुका करण्यात आल्या आहेत. समन्वयकांचे मुख्य काम दोन्ही पक्षांतील बंडखोरांना शांत करणे, मतविभाजन टाळणे आणि महायुतीच्या उमेदवारांना पूर्ण ताकद देणे आहे. ज्या प्रभागात भाजपचा उमेदवार आहे, तेथे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची मोट बांधून मतदानाची टक्केवारी वाढवणे, तसेच शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रभागात भाजपची मते वळवणे, यासाठी समन्वयक प्रयत्न करणार आहेत. याशिवाय मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांशी समन्वय साधून प्रचारात त्यांना सहभागी करून घेण्याचे कामही त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.




मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर
बंडखोरीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मैदानात उतरले आहेत. जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी भावनिक आवाहन केले. सरकार आपले आहे, महापालिकांमध्येही आपलीच सत्ता येणार आहे. आज न्याय मिळाला नाही, पण भविष्यात नक्कीच मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. उमेदवारी डावललेल्यांना महापालिकेत स्वीकृत सदस्य, जिल्हा, विभागीय, राज्यस्तरीय शासकीय समित्यांवर काम करण्याची संधी, विविध महामंडळांवर पदे किंवा पक्षसंघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.




Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Nashik Kumbhmela : नाशिक-त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार ! सिंहस्थ कुंभमेळ्यावर तब्बल ३५ हजार कोटींचा खर्च

Nashik Kumbhmela : हिंदू धर्मीयांच्या आस्थेशी जोडलेल्या कुंभमेळ्याने गतवर्षी प्रयागराजमध्ये गर्दीचे नवे विक्रम

PM Selfie Video : भारताचा विकास दर ७.८%; पंतप्रधान मोदींकडून नागरिकांचे अभिनंदन, म्हणाले- ‘ही आपल्या सामूहिक शक्तीची ओळख’

नवी दिल्ली : भारताने आर्थिक विकासाच्या बाबतीत दमदार कामगिरी करत आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच