वसई-विरार पालिका निवडणुकीत ५४७ उमेदवार रिंगणात

विरार : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत २८६ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे एकूण ५४७ उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी पाहायला मिळाली असून, काही प्रमाणात उमेदवारांची मनधरणी करण्यातही राजकीय पक्षांना यश आले आहे.


वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या जागांसाठी विविध राजकीय पक्षाच्या व अपक्ष अशा ९३५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील ६४ अर्ज छाननी दरम्यान बाद झाले होते. तर ८३३ अर्ज वैध ठरविण्यात आले होते.


शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. त्यादिवशी २८६ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता ५४७ उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे.


प्रभागनिहाय     उमेदवार   संख्या




  1. प्रभाग               माघार      कायम

  2. ए                        १८         ४०

  3. बी                       १५        ७८

  4. सी                      ५०        ५९

  5. डी                      १५         ६८

  6. ई                        ३९         ५०

  7. एफ                    ४२         ७४

  8. जी                      ४२         ६६

  9. एच                     ३७         ५४

  10. आय                  २८           ५८

Comments
Add Comment

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

CM Devendra Fadnavis : 'भाजप कार्यकर्त्यांनी फेक नरेटिव्हविरुद्ध लढण्यास सज्ज व्हावे'

पुणे : काँग्रेसने माओवादापासून स्फूर्ती घेत खोटेनाटे सांगत देशात अराजक माजवण्याचा विडा उचलला आहे.

CM Devendra Fadnavis : 'CJP म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, चार-पाच तरुण केवळ मोहरे'

पुणे : ‘सीजेपी’ या नावामागे केवळ छोटीशी संघटना नसून, हा ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री

Eknath Shinde : मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट

मुंबई : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त

Tamil Nadu Politics : TVK च्या राजकीय मोहिमेमुळे काँग्रेस अस्वस्थ

चेन्नई : तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वातल्या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण सत्ताधारी