महापौर, गटनेते, अध्यक्ष यांच्या दालनाच्या कामाची आयुक्तांनी केली पाहणी

येत्या १५ दिवसाच्या आत सर्व दालने सुस्थितीत करून ठेवा, असे दिले निर्देश


मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता येत्या १५ जानेवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडून दुसऱ्याच दिवशी मतमोजणीची प्रक्रियाही पार पडणार आहे. यानंतर महापालिका स्थापन होऊन महापौर तसेच वैधानिक आणि गटनेते तसेच विशेष समित्यांचे अध्यक्ष यांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे महापौर आणि इतर समिती अध्यक्ष तसेच गटनेते यांच्या दालनाच्या डागडुजी कामाचा आढावा महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी महापालिका मुख्यालयातील जुन्या इमारतीत फिरून घेतला. येत्या १५ दिवसाच्या आत कार्यालये यांची कामे आणि व्हरांडा याची कामे केली जावीत, तसेच व्हरांड्यात एक समान आसनांची व्यवस्था करावी असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.



मुंबई महापालिकेचा कार्यकाल ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात झाल्यानंतर ०८ मार्च २०२२ पासून महानगरपालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. तेव्हापासून महानगरपालिका आणि त्याअंतर्गत वैधानिक आणि विशेष समित्या अस्तित्वात नाहीत. परिणामी महापौर कार्यालय, विविध वैधानिक तसेच विशेष समिती अध्यक्ष कार्यालय, सभागृह नेते कार्यालय, विरोधी पक्षनेते कार्यालय इत्यादी विविध कार्यालये बंद आहेत. तसेच प्रशासकांच्या निर्देशानुसार सर्व महापालिका पक्ष कार्यालये सीलबंद करण्यात आली आहेत. तेव्हापासून जवळजवळ तीन वर्षे कार्यालयांना देखभालीअभावी दुरुवस्था झाली आहे. या कार्यालयांना वाळवी लागल्याने ही कार्यालये आता वापरण्याच्या स्थितीत नाहीत.


मात्र, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यासर्व दालनांसह कार्यालयांची तपासणी करण्यात आली. त्यात सर्वच दालनांमध्ये मोठ्याप्रमाणात वाळवी लागून फर्निचर, दरवाजे, खिडक्या आणि इतर लाकडी सामान वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, मोठया प्रमाणात भिंतीवरील रंग उडल गेला आहे, भिंती-छत फरशीमध्येही भेगा पडणे, दरवाजा खिडक्यांच्या बिजागऱ्या तुटणे आदी प्रकारे कार्यालयांची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीनंतर महापालिका स्थापन झाल्यानंतर महापौर,विरोधी पक्षनेते, सभागृहनेते, विविध पक्ष कार्यालये तसेच वैधानिक आणि विशेष समिती अध्यक्षांची दालने सुसज्ज ठेवण्याच्यादृष्टीकोनातून डागडुजीची कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी जे पी इन्फाप्रोजेक्ट या कंपनीची निवड करण्यात आली असून या डागडुजीच्या कामांसाठी विविध करांसह १.२२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.


आता प्रत्यक्षात निवडणूक प्रकिया सुरू झाली असून पुढील १५ दिवसांमध्ये महापौर आणि उपमहापौर विराजमान होवून, स्थायी, शिक्षण,सुधार आणि बेस्ट समिती यांचे अध्यक्ष निवड होऊन तेही विराजमान होतील. त्यामुळे त्यांची दालने सुस्थितीत असावीत आणि त्यादृष्टिकोनातून कामे केली जात आहेत का? जी कामे केली ती योग्य प्रकारे आहेत का? कोणत्या दालनाची कामे अपूर्ण आहेत याचा आढावा महापालिका सचिव मंजिरी देशपांडे आणि मुख्यालय इमारत देखभाल विभागाचे कार्यकारी अभियंता संजय आढाव यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह कामाची पाहणी केली .



सभागृह नेत्याला दालन असतं का?


महापालिका आयुक्त सर्व दालनांची पाहणी करताना पहिल्या मजल्यावर सभागृह नेत्यांच्या दालनापर्यंत पोहोचले. तिथे सभागृह नेत्याच्या दालनाची पाटी वाचून इथे सभागृह नेत्याला सुद्धा दालन असतं का असा सवाल महापालिका सचिवांकडून माहिती जाणून घेतली.

Comments
Add Comment

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर