घातक बेबी फूडवर नेस्ले इंडियाचे महत्वाचे विधान कंपनी म्हणते ही उत्पादने आम्ही भारतात....

प्रतिनिधी: नेस्ले कंपनीच्या उत्पादनात लहान मुलांसाठी घातक घटक पदार्थ असल्याची चौफेर टीका झाल्यानंतर भारतात ही उत्पादने विकली गेलीच नसल्याचा दावा नेस्ले इंडिया (Nestle India) कंपनीकडून करण्यात आला आहे. बाळाच्या आरोग्यासाठी घातक असलेल्या सेरेलुईड टॉक्सॉइड (Cereulide Toxin) असलेल्या घटकांचा समावेश नव्या विकल्या जाणाऱ्या भारतीय उत्पादनांच्या बॅचमध्ये नसल्याचे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. आपल्या निवेदनात नेस्ले इंडियाने म्हटले आहे की, त्यांनी देशात अलीकडे परत मागवलेल्या उत्पादनांपैकी कोणतेही उत्पादन विकलेले किंवा आयात केलेले नाही. कंपनीने पुढे सांगितले की, भारतात विकले जाणारे सर्व शिशु फॉर्म्युला ब्रँड्स स्थानिक पातळीवर उत्पादित केले जातात.' कंपनीच्या जगभरातील उत्पादनातील घटकांवर टीका झाल्यावर नेस्ले मूळ कंपनीने काही बेबी फॉर्म्युला उत्पादने जागतिक स्तरावर परत मागवल्यानंतर हे विधान आले आहे.


'नेस्ले इंडिया परत मागवलेल्या किंवा मागे घेतलेल्या उत्पादनांपैकी किंवा बॅचपैकी कोणतेही उत्पादन आयात करत नाही किंवा विकत नाही' असे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.'भारतात विकले जाणारे सर्व शिशु फॉर्म्युला ब्रँड्स स्थानिक पातळीवर उत्पादित केले जातात. आम्ही या उत्पादनांवर सखोल चाचणी केली आहे आणि आम्ही याची पुष्टी करतो की ती सर्व FSSAI आणि लागू नियम व नियमांचे पालन करतात' असेही नेस्ले इंडियाने एका निवेदनात स्पष्ट केले आहे.


यापुढे आपल्या निवेदनात,'आमच्या ग्राहकांची सुरक्षा आणि कल्याण ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आमची सर्व उत्पादने FSSAI आणि लागू नियम व नियमांचे पूर्णपणे पालन करतात. एका प्रमुख पुरवठादाराने पुरवलेल्या घटकामध्ये गुणवत्तेची समस्या आढळल्यानंतर, नेस्लेने युरोपमध्ये उत्पादित केलेल्या काही शिशु फॉर्म्युला उत्पादनांच्या बॅचसाठी काही देशांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून उत्पादन परत मागवणे/मागे घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत संबंधित उत्पादनांमुळे कोणत्याही आजाराची पुष्टी झालेली नाही' असेही त्यात म्हटले आहे.


यापूर्वीही २०२३ मध्ये कंपनीच्या बेबी फूडवर तज्ञांनी टीका केली होती. त्यानंतर यासंबंधीची भारताच्या अन्न सुरक्षा नियामक मंडळ एफ एसएसएआय (FISAAI) ने चौकशी केली होती. त्यामुळेच जानेवारी २०२६ मध्ये स्विस पॅकेज्ड फूड कंपनीने मंगळवारी काही बेबी फॉर्म्युला उत्पादने परत मागवली होती. बाळाच्या अन्नात एक विषारी पदार्थ असू शकतो ज्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते अशी चिंता व्यक्त केली जात असल्याने कंपनीनेही तपासणीसाठी जुन्या बँचची उत्पादने परत मागवली होती.जागतिक कंपनीने म्हटले आहे की, 'एका प्रमुख पुरवठादार (Suppplier) पुरवलेल्या घटकामध्ये गुणवत्तेची समस्या आढळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.'


विशेषतः जानेवारी २०२६ मध्ये विषाच्या जोखमीवर (सेरुलाइड) बेबी फॉर्म्युला मुद्दा आणि २०१५ च्या मॅगी नूडल्स लीड प्रमाण भयावतेसारखे भूतकाळातील वाद यासारख्या प्रमुख बाबींबद्दल अन्न नियामकाकडून कंपनीच्या उत्पन्नाची चौकशी केली असताना नेस्ले अनेकदा रिकॉलवर सहकार्य करते असे कंपनीने म्हटले होते.अनेकदा कंपनीने अशा निकालावर न्यायालयात नियामक कृतींना आव्हान दिले आहे. कंपनीचा मते,ते त्यांच्या स्वतःच्या कठोर नियंत्रणांवर भर देतात तर अधिकारी सार्वजनिक संरक्षण आणि अनुपालनावर लक्ष केंद्रित करतात.आता मध्यपूर्वेतील ईडीई (Emirates Drug Establishment EDE) नियामकांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने नेस्लेने आपल्या जुन्या उत्पादने परत मागवत त्याची चिकित्सा सुरू केली आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Sugar hoarding : साखरेच्या साठेबाजीला आळा; केंद्र सरकारकडून स्टॉक लिमिट २ हजार क्विंटलवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर