बस पुरवण्यासह चार्जिंग स्टेशनचे कामही पुरवठादाराकडून रखडले

ठोस कारवाई करण्यास एसटी महामंडळ धजावत नसल्याची चर्चा


मुंबई :राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ई-बस प्रकल्पाचा मोठा गाजावाजा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात चित्र निराशाजनक आहे. ३१ डिसेंबरपर्यंत अपेक्षित एक हजार गाड्यांपैकी २५ टक्के गाड्या ताफ्यात दाखल झालेल्या नाहीत. पुरवठादाराकडून बस पुरवण्यासह चार्जिंग स्टेशनचे कामही रखडले आहे. वारंवार कालमर्यादा ओलांडलेल्या पुरवठादारांवर ठोस कारवाई करण्यास एसटी महामंडळ धजावत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


केंद्रीय अनुदानावर एसटी महामंडळाच्या ताफ्यातील ३० टक्के बसगाड्या विजेवर धावणाऱ्या करण्यासाठी पाच हजार १५० ई-बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. १३ फेब्रुवारी २०२४ पासून या ताफ्यात येण्यास सुरुवात झाली. वर्षभरानंतर केवळ २२२ गाड्या दिल्याने महामंडळाने पुरवठादाराला नाममात्र चार कोटी रुपयांचा दंड ठोठावला. एप्रिल २०२५ पासून दरमहा २०० गाड्या देण्याचे आश्वासन कंत्राटदाराने महामंडळाला दिले, मात्र डिसेंबरअखेर ५१५ गाड्यांची भर पडली.


३१ डिसेंबर २०२५ अखेर ७३७ बसगाड्या एसटी ताफ्यात दाखल झाल्या आहेत. यात नऊ मीटरच्या २६० व १२ मीटरच्या ४७७ अशा गाड्यांचा समावेश आहे. परिणामी, एसटी प्रवासी अन्य प्रवासी वाहनांकडे वळत आहेत. एसटीच्या वाहन स्थितीनुसार ३१ डिसेंबरपर्यंत एसटी ताफ्यात १५ हजार २२१ बसगाड्या आहेत. यातील निम्म्याहून अधिक आयुर्मान पूर्ण झालेल्या गाड्यांचा समावेश आहे. यामुळे मार्गात बंद पडणे, नादुरुस्त असणे, गाड्यांची स्थिती बिकट असणे अशा तक्रारी वाढत आहेत.


राज्यातील १७१ ठिकाणी उच्च क्षमतेचे चार्जिंग स्टेशन उभारणीचे कामदेखील याच बस-पुरवठादाराकडे आहे. डिसेंबरअखेर केवळ ३१ ठिकाणी अशी स्टेशन कार्यान्वित करण्यात आली आहेत.


एसटी महामंडळाला बसची गरज : एसटी कर्मचाऱ्यांचा दोन वर्षांपूर्वी झालेल्या संपाची एसटी महामंडळाला मोठी झळ बसली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा २०२१ मध्ये झालेला संप सुमारे ५४ दिवस चालला होता, जो २८ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू झाला आणि २० डिसेंबर २०२१ रोजी संपला, ज्यात कर्मचाऱ्यांनी शासनात विलीनीकरण आणि पगारवाढीच्या मागण्यांसाठी आंदोलन केले होते. तब्बल दोन महिने बस जाग्यावरच उभ्या राहिल्याने अनेक बसवर परिणाम झाल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.