Video : धक्कादायक! पाच मुस्लिम मुलींनी हिंदू विद्यार्थिनीला घेरलं अन् बुरखा घालायला लावला; 'त्या' व्हिडिओने खळबळ

मुरादाबाद : उत्तर प्रदेशातील बिलारी शहरात एका अल्पवयीन हिंदू विद्यार्थिनीसोबत घडलेल्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. १२ वीत शिकणाऱ्या पीडितेच्याच पाच मुस्लिम मैत्रिणींनी तिला कोचिंग क्लासबाहेर घेरून जबरदस्तीने बुरखा परिधान करण्यास भाग पाडले. "बुरख्यात तू सुंदर दिसशील आणि इस्लाम स्वीकारल्यास तुझे नशीब बदलेल," असे सांगून मुलींनी पीडितेवर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. २० डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून, पीडितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी पाचही आरोपी मुलींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.



मुरादाबाद प्रकरणातील पीडितेच्या भावाचा मोठा खुलासा...


पीडित मुलीच्या भावाने पोलिसात दिलेल्या तक्रारीत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या बहिणीचे पद्धतशीरपणे 'ब्रेनवॉशिंग' करण्यात आले असून, तिला कुटुंबापासून तोडण्याचा आणि धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा भावाने केला आहे. पीडित मुलगी शाहकुंज कॉलनीतील एका ट्यूटरकडे शिकवणीसाठी जात असे. तिच्यासोबतच परिसरातील ५ मुस्लिम मुलीही अकरावी-बारावीत शिकत होत्या. शेजारी आणि मैत्रिणी असल्याने त्या एकत्र शाळेत आणि कोचिंगला जात असत. मात्र, याच मैत्रीचा फायदा घेऊन आरोपी मुलींनी पीडितेच्या मनात तिच्या स्वतःच्या धर्माबद्दल द्वेष निर्माण करण्यास सुरुवात केली. तिला वारंवार इस्लाम धर्म स्वीकारण्याचे आमिष दाखवण्यात आले, ज्यामुळे ती घरातील लोकांचेही ऐकेनाशी झाली होती. २० डिसेंबर रोजी ट्यूशनवरून घरी परतत असताना या पाचही मुलींनी पीडितेला वाटेत अडवून तिला जबरदस्तीने बुरखा घालण्यास भाग पाडले. या प्रकरणावर भाष्य करताना पीडितेच्या भावाने सांगितले की, "हा केवळ मुलींमधील वाद नसून यामागे एखादी मोठी इस्लामिक संघटना असू शकते. अल्पवयीन हिंदू मुलींना धर्मांतराच्या जाळ्यात ओढण्यासाठी विद्यार्थीनींचा वापर केला जात आहे." या प्रकरणाची सखोल चौकशी करून यामागील सूत्रधाराला अटक करण्याची मागणी आता जोर धरत आहे.


?feature=share

मुरादाबादमध्ये धर्मांतराच्या प्रयत्नाने हिंदू संघटना आक्रमक!


या प्रकारामुळे स्थानिक हिंदू संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, शैक्षणिक संस्थांमध्ये सुरू असलेला धर्मांतराचा हा छुपा खेळ तत्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. शाळा आणि कोचिंग क्लासेसना अशा धार्मिक वादांपासून आणि 'धर्मांतराच्या सावली'पासून वाचवण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, असा पवित्रा संघटनांनी घेतला आहे. एसपी ग्रामीण कुंवर आकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. तपासादरम्यान जे काही पुरावे हाती लागतील, त्यावरून पुढील ठोस पावले उचलली जातील. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, जर या पाचही मुली दोषी आढळल्या, तर त्यांना ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाईल. आरोपी मुली अल्पवयीन असल्याने त्यांना न्यायालयीन कोठडीत 'शांती निकेतन' किंवा 'बाल सुधारगृहात' पाठवले जाण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यासाठी कमाल ५ वर्षांचा कारावास आणि १५,००० रुपयांच्या दंडाची तरतूद कायद्यात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यांत सहसा अटक केली जात नाही. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य आणि सामाजिक संताप पाहता, पोलीस विशेष अधिकारांचा वापर करून या मुलींना अटक करण्याच्या विचारात आहेत.

Comments
Add Comment

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?

Gold Silver Rate Today : PM मोदींचे 'ते' आवाहन अन् सोन्या-चांदीचे भाव गडगडले! चांदी थेट 'इतक्या' हजारांनी स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

मुंबई : परदेशी चलनावरील वाढता दबाव कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारपेठेत संतुलन राखण्यासाठी पंतप्रधान

Uzbekistan 30 Days Visa Free Entry : भारतीय पर्यटकांसाठी मोठी खुशखबर! उझबेकिस्तानमध्ये ३० दिवस व्हिसामुक्त प्रवास

नवी दिल्ली : परदेशात फिरण्याचा प्लॅन करणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी मोठी खुशखबर आहे. उझबेकिस्तानने भारतीय

PM Selfie Video : भारताचा विकास दर ७.८%; पंतप्रधान मोदींकडून नागरिकांचे अभिनंदन, म्हणाले- ‘ही आपल्या सामूहिक शक्तीची ओळख’

नवी दिल्ली : भारताने आर्थिक विकासाच्या बाबतीत दमदार कामगिरी करत आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के

Earthquake News : भारतात पुन्हा भूकंपाचे धक्के; जम्मू-कश्मीर, सिक्कीमसह अफगाणिस्तानातही सलग हादरे

नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी भारतासह अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. १ सप्टेंबर

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ