विमान अपघातापूर्वी नेमकं काय घडलं? पायलटने दिलेला 'तो' शेवटचा संदेश आणि प्राथमिक अहवाल समोर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


बारामती : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. आज, २९ जानेवारी रोजी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एका दुर्दैवी अपघातात त्यांचे निधन झाल्याची बातमी समजताच पवार कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. या अंत्यविधीसाठी देशातील आणि राज्यातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय नेते, इतर महत्त्वाचे राजकीय पदाधिकारी कालपासूनच त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून, आपल्या लाडक्या नेत्याचा अखेरचा निरोप घेण्यासाठी बारामतीत जनसागर लोटला आहे. प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून संपूर्ण शहर सध्या भावनांने डबडबलेले आहे.


पायलटचा शेवटचा संवाद आणि तांत्रिक बिघाड


मिळालेल्या माहितीनुसार, लँडिंगच्या काही सेकंद आधी वैमानिकाचा एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, पायलटने विमानाच्या इंजिनमधील बिघाड किंवा तांत्रिक अडचणीबाबत शेवटचा संकेत दिला होता. "आम्ही नियंत्रण गमावत आहोत," अशा आशयाचा संदेश देऊन काही क्षणातच संपर्क तुटला आणि विमानाचा अपघात झाला.


एटीसी (ATC) अहवालातून विमान अपघाताचा थरार उघड


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या (ATC) हवाल्याने आता अत्यंत महत्त्वाची आणि काळजाचा ठोका चुकवणारी माहिती समोर आली आहे. २८ जानेवारीच्या सकाळी नेमकं काय घडलं, याचा मिनिटा-मिनिटाचा तपशील प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाला आहे. विमानाचा बारामती एटीसीशी पहिला संपर्क झाला. त्यावेळी हवामान स्थिर होते आणि दृश्यमानता (Visibility) साधारण ३००० मीटर इतकी होती. पायलटने रनवे क्रमांक ११ च्या दिशेने येत असल्याचे सांगितले, मात्र सुरुवातीला त्यांना धावपट्टी स्पष्ट दिसत नव्हती. "रनवे दिसला की पुन्हा कळवतो," असा संदेश वैमानिकाने एटीसीला दिला होता. एटीसीने रनवे क्रमांक ११ लँडिंगसाठी पूर्णपणे सज्ज केला होता. मात्र, याच वेळी पायलटकडून मिळणारा प्रतिसाद अचानक बंद झाला.


एटीसीवरील ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, विमानाशी संपर्क तुटल्यानंतर काही सेकंदातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला भीषण ज्वाळा आणि धुराचे लोट आकाशात उठताना दिसले. रनवे दिसण्याच्या प्रयत्नात असतानाच विमानाचा तांत्रिक बिघाडामुळे किंवा अन्य कारणाने अपघात झाल्याचे प्राथमिक दर्शनी स्पष्ट होत आहे.

Comments
Add Comment

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी