मुंबईकरांसाठी बीडीडी घरांची मोठी सोडत; वरळी आणि नायगाव मध्ये सर्वाधिक घरांचे वितरण

मुंबई : मुंबईकरांसाठी बीडीडीने घरांची सोडत जाहीर केली आहे. वरळी, ना. म. जोशी मार्ग, वरळी आणि नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासांतर्गत पुनर्वसित इमारतींची कामे वेगात सुरु आहेत. वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग परिसरातील पुनर्वसित इमारतींमधील घरांचे वाटप टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, २०२६ च्या एप्रिलपर्यंत मोठ्या प्रमाणावर घरांचा ताबा दिला जाणार आहे.


मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाच्या माध्यमातून या तीन ठिकाणी पुनर्विकासाचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ३,६६६ सदनिका उभारण्याचे नियोजन असून, त्यापैकी सुमारे १,४०० हून अधिक घरे जवळपास पूर्ण झाली आहेत. यातील काही कुटुंबांना फेब्रुवारी अखेरीस घरांच्या चाव्या दिल्या जाणार आहेत.


अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नायगाव परिसरातील ८६४ घरे आणि वरळीतील ५७४ घरे बांधकामाच्या दृष्टीने तयार असून, त्यांना आवश्यक निवासी प्रमाणपत्रेही प्राप्त झाली आहेत. पूर्वी काही तांत्रिक अडचणी आणि निवडणूक आचारसंहितेमुळे वितरण प्रक्रियेला विलंब झाला होता. मात्र, आता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून घरांचा ताबा देण्याची तयारी पूर्ण झाली आहे.


वाटपाच्या वेळापत्रकानुसार, फेब्रुवारीमध्ये वरळी आणि नायगावमधील घरे वितरित केली जातील. त्यानंतर मार्चमध्ये वरळीतील आणखी घरे आणि एप्रिलमध्ये ना. म. जोशी मार्ग परिसरातील सदनिका रहिवाशांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. या प्रक्रियेमुळे पहिल्या टप्प्यातील सर्व ३,६६६ कुटुंबांचे पुनर्वसन एप्रिलपर्यंत पूर्ण होणार आहे.


वरळी


फेब्रुवारी ५७४
मार्च २८०
एकूण १७०८


नायगाव


फेब्रुवारी ८६४
मार्च २३७


ना. म. जोशी मार्ग


एप्रिल ५७७


एकूण घरे - ३६६६


बीडीडी चाळ पुनर्विकासांतर्गत पात्र रहिवाशांना सुमारे ५०० चौरस फुटांचे आधुनिक सदनिका देण्यात येत आहेत. आधीच वरळीतील काही रहिवाशांना या नव्या इमारतींमध्ये स्थलांतरित करण्यात आले असून, उर्वरित कुटुंबे आता आपल्या हक्काच्या घरांची वाट बघत आहेत.


मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण बीडीडी पुनर्विकास प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. पुढील टप्प्यांतील इमारतींची कामे जसजशी पूर्ण होतील, तसतसे उर्वरित रहिवाशांनाही नव्या घरांचा ताबा देण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव