रिलायन्स समूहाची १८०० कोटींची मालमत्ता जप्त

अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कंपन्यांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरण


नवी दिल्ली : रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याशी संबंधित कंपन्यांविरुद्ध सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीचा भाग म्हणून १,८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची नवीन मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी जप्त केली. या कारवाईसह या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेने जप्त केलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य आता अंदाजे १२,००० कोटी रुपये झाले आहे. ही कारवाई रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड (आरसीएफएल), रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड (आरसीएफएल), येस बँक घोटाळा तसेच रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडशी संबंधित कथित फसवणुकीच्या प्रकरणांशी संबंधित आहेत.


नवीन जप्तींमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे बीएसईएस यमुना पॉवर, बीएसईएस राजधानी पॉवर आणि मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडमधील शेअरहोल्डिंगचा समावेश असल्याचे ईडीने म्हटले आहे. व्हॅल्यू कॉर्प फायनान्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड यांच्याकडे असलेल्या १४८ कोटी रुपयांच्या बँक ठेवी आणि १४३ कोटी रुपयांच्या मिळकती तात्पुरत्या स्वरूपात जप्त करण्यात आल्या असल्याचे ईडीने सांगितले. कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अंगराई सेथुरामन यांच्या नावावर असलेले एक निवासी घर आणि दुसरे वरिष्ठ कर्मचारी पुनीत गर्ग यांचे शेअर्स आणि म्युच्युअल फंडदेखील जप्त करण्यात आले आहेत. या जप्तीचे एकूण मूल्य १,८८५ कोटी रुपये असल्याचे ईडीने सांगितले.

Comments
Add Comment

School Bag Policy 2020 : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होणार! ‘स्कूल बॅग पॉलिसी २०२०’ची काटेकोर अंमलबजावणी

मुंबई : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करून शिक्षण प्रक्रिया अधिक आनंददायी, सुलभ व

Eknath Shinde : जोगेश्वरी एसआरए प्रकरणी मोठी कारवाई; संबंधित दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे निर्देश

मुंबई : जोगेश्वरी, गोरेगाव या भागात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) सदनिका वाटपात पात्र लाभार्थ्यांना

Mumbai Local Train : रेल्वे प्रवासी कृपया लक्ष द्या, रविवारी कुठे मेगाब्लॉक आहे ते जाणून घ्या

मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे

Prakash Abitkar : 'अवयवदानाबाबत राज्यभर व्यापक प्रबोधन मोहीम राबवा'

मुंबई : महाराष्ट्रात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंमलात आल्यापासून आणि २०११ व २०१४ मधील सुधारित कायद्यांनुसार

CM Devendra Fadnavis : 'भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराच्या यशात महाराष्ट्र प्रमुख भागीदार ठरणार'

मुंबई : भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा केवळ शुल्क, नियम आणि बाजारपेठेतील प्रवेशापुरता मर्यादित नसून

BARTI : एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना ‘बार्टी’कडून १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित