समुद्रमार्गाने गाठा कोकणाची वाट; मुंबई–विजयदुर्ग रो रो फेरी १ मार्चपासून सेवेत; जाणून घ्या वेळ आणि तिकीट

मुंबई : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी समुद्रमार्गाचा पर्याय पुन्हा एकदा उपलब्ध होत आहे. मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान रो रो फेरी सेवा १ मार्च २०२६ पासून सुरू होत असून, या सुविधेमुळे रस्त्यावरील दीर्घ आणि वाहतूक कोंडीचा प्रवास टाळता येणार आहे.


आणि याचे उदघाटन सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे स्वतः मुंबई ते विजयदुर्ग असा प्रवास करून या सुविधेचे उदघाटन करणार आहेत.



असा असेल प्रवासाचा आराखडा


‘एम२एम प्रिंसेस’ ही फेरी सकाळी ८ वाजता मुंबईतून भाऊच्या धक्क्यावरून सुटेल आणि दुपारी ३ वाजता विजयदुर्ग येथे पोहोचेल. परतीची फेरी दुपारी १२ वाजता विजयदुर्गहून निघून सायंकाळी ७ वाजेपर्यंत मुंबईत दाखल होईल. एकूण प्रवासाचा कालावधी सुमारे सात तासांचा असेल.



मार्च २०२६ मधील फेऱ्या


मुंबई ते विजयदुर्ग : १, ४, ७, ११, १४, १८, २१ आणि २५ मार्च
विजयदुर्ग ते मुंबई :२, ५, ८, १२, १५, १८, २२ आणि २६ मार्च



भाडे तपशील


इकॉनॉमी – २,५०० रुपये
प्रीमियम इकॉनॉमी – ४,००० रुपये
बिझनेस क्लास – ७,५०० रुपये
फर्स्ट क्लास – ९,००० रुपये
दुचाकी – १,००० रुपये
सायकल – ६०० रुपये
चारचाकी – ६,००० रुपये
बस – १३,००० ते २१,००० रुपये



कोकणाला नवा पर्याय


समुद्रमार्गामुळे प्रवास अधिक सुखकर होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः पर्यटन हंगामात या सेवेचा फायदा होणार असून स्थानिक व्यवसाय, हॉटेल उद्योग आणि व्यापार क्षेत्रालाही चालना मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर