Apple Pay : लवकरच भारतात होणार 'ऍपल पे' लाँच

जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी Apple Inc. भारतातील डिजिटल पेमेंट क्षेत्रात मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘ऍपल पे’ (Apple Pay) ही सेवा भारतात लाँच होण्याची शक्यता असून, ब्लूमबर्गच्या ताज्या अहवालानुसार जून-जुलै २०२६ पर्यंत ती अधिकृतपणे सुरू होऊ शकते. भारतातील आयफोन वापरकर्त्यांसाठी ही मोठी बातमी मानली जात आहे.


सध्या भारतातील डिजिटल पेमेंट बाजारात गुगल-पे, फोन-पे आणि पेटीएम यांसारख्या ऍप्सचं वर्चस्व आहे. मात्र ‘ऍपल पे ’ आयफोन आणि ऍपल वॉच वापरकर्त्यांसाठी अधिक सुरक्षित आणि गोपनीय पर्याय ठरू शकतो. ही सेवा ‘टोकनायझेशन’ तंत्रज्ञानावर आधारित असून व्यवहार करताना प्रत्यक्ष कार्ड क्रमांक शेअर केला जात नाही, त्यामुळे सुरक्षेची पातळी अधिक मजबूत राहते. एनएफसी तंत्रज्ञानाच्या मदतीनं ग्राहक दुकानांमध्ये ‘टॅप-टू-पे’ पद्धतीनं सहज व्यवहार करू शकतील. याशिवाय ऑनलाइन खरेदी आणि विविध ऍप्समधील पेमेंट्सही सुलभ होतील. फेस आयडी किंवा टच आयडीद्वारे प्रमाणीकरण केल्यामुळे गोपनीयता आणि सुरक्षिततेला अधिक बळ मिळणार आहे.


भारतात सेवा सुरू करण्यासाठी ऍपलने आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि ऍक्सिस बँक यांसारख्या प्रमुख बँकांशी तसेच व्हिसा आणि मास्टरकार्ड या आंतरराष्ट्रीय कार्ड नेटवर्कशी चर्चा सुरू केली आहे. तसेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबतही प्राथमिक बोलणी सुरू असल्याची माहिती आहे.


भारतीय नियमांनुसार डेटा लोकलायझेशन आणि यूपीआय एकत्रीकरण महत्त्वाचे असल्याने सुरुवातीला कार्ड-आधारित संपर्करहित पेमेंट्स सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर यूपीआय सेवा जोडली जाऊ शकते. भारतामध्ये डिजिटल व्यवहारांचा वेग झपाट्याने वाढत असताना ‘ऍपल पे’ची एन्ट्री स्पर्धा अधिक तीव्र करणार आहे. सेवा सुरू झाल्यास आयफोन वापरकर्त्यांना अधिक सुरक्षित, जलद आणि सुविधाजनक पेमेंट अनुभव मिळण्याची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : 'CJP म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, चार-पाच तरुण केवळ मोहरे'

पुणे : ‘सीजेपी’ या नावामागे केवळ छोटीशी संघटना नसून, हा ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Eknath Shinde : मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट

मुंबई : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त

India Semicon 2.0 Scheme : भारताची 1.27 लाख कोटींची सेमीकॉन योजना

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात चिप निर्मितीच्या संपूर्ण यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी 1.27 लाख कोटी रुपये