Nagpur Crime : पिचकारी मारली म्हणून आजीने थेट नातवाच्या अंगावर ओतले गरम पाणी; व्हिडिओ व्हायरल

नागपूर : होळीचा सण म्हणजे रंगाचा आणि पाण्याचा त्याशिवाय होळी ही अपूर्ण, अशीच होळी खेळताना नातवाने आजीवर पिचकारी उडवली आणि आजीने संतापाच्या भरात असं काही केलं की तो लहान मुलगा चक्क ४५ टक्के भाजला.


 


नेमकं घडलं काय ?


नागपुरातील कोराडी परिसरात होळीच्या दिवशी एक भयंकर आणि संतापजनक घटना घडली आहे. तर झालं असं ओम हरीश वांगे हा चार वर्षांचा चिमुरडा घराबाहेर होळी खेळत होता. त्याच वेळी त्याची आजी गरम घराबाहेरून गरम पाणी घरात नेत होती. खेळण्याचा नादात ओमने आजीच्या अंगावर पिचकारीने पाणी उडवले आणि या किरकोळ घटनेमुळे आजीचा राग अनावर झाला, हातातील बादलीत असलेले पूर्ण गरम पाणी तिने ओमच्या अंगावर ओतले. उकळते पाणी अंगावर पडताच अंग भाजल्याने ओम वेदनेने ओरडू लागला.


ओमचा ओरडाओरड ऐकून शेजारी धावून आले तातडीने त्याच्या अंगावर थंड पाणी जरी ओतले तोपर्यंत कंबरेखालुन मुलगा चांगलाच भाजला आहे. प्राथमिक माहितीनुसार ओम ४५ टक्के भाजला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.