राज्याच्या अर्थव्यवस्थेची ७.९ टक्क्यांच्या वेगाने घोडदौड

- आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात सादर; दरडोई उत्पन्न ३,४७,९०३ रुपयांवर


मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्राने आपली प्रगतीची घोडदौड कायम राखली असून, चालू आर्थिक वर्षात (२०२५-२६) राज्याच्या अर्थव्यवस्थेत ७.९ टक्के वाढ अपेक्षित आहे. राज्याची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मजबूत आणि गतिशील असून कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रांचा समतोल हे तिचे मुख्य वैशिष्ट्य असल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी २०२५-२६ अहवालातून स्पष्ट झाले आहे.


अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी गुरुवारी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडला. या अहवालानुसार राज्याच्या दरडोई उत्पन्नानेही मोठी झेप घेतली असून ते ३ हजार ४७ हजार ९०३ रुपयांवर पोहोचले आहे. राज्याच्या एकूण मूल्यवृद्धीत सेवा क्षेत्राचा वाटा सर्वाधिक असून त्यात ९.० टक्के वाढीचा अंदाज आहे. त्यापाठोपाठ उद्योग क्षेत्रात ५.७ टक्के आणि कृषी व संलग्न क्षेत्रांत ३.४ टक्के वाढ अपेक्षित आहे. सलग पाचव्या वर्षी राज्याच्या अर्थव्यवस्थेची वाढ कायम राहण्याचा हा सकारात्मक कल आहे.


महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न ३ लाख ४७ हजार ९०३ रुपये असून ते देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नापेक्षा (२ लाख १९ हजार ५७५ रुपये) सुमारे दीड पटीने जास्त आहे. देशाच्या एकूण सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात (जीडीपी) राज्याचा वाटा १४.० टक्के इतका असून तो देशात सर्वाधिक आहे. सन २०२५-२६ साठी राज्याचे सांकेतिक स्थूल उत्पन्न ५१,००,५९७ कोटी रुपये इतके अंदाजित आहे.



महागाई दर नियंत्रणात :


- गेल्या काही वर्षांत रस्ते, मेट्रो, बंदरे आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील भरीव गुंतवणुकीमुळे राज्याच्या विकासाला गती मिळाली आहे. गतवर्षी राज्यात सरासरीच्या १०९.१ टक्के पाऊस झाला.


- तृणधान्ये (१०.६ टक्के), ऊस (२२.० टक्के) आणि कापूस (७.० टक्के) यांच्या उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. मात्र, कडधान्ये आणि तेलबियांच्या उत्पादनात अनुक्रमे २८.२ टक्के व ४७.४ टक्के मोठी घट अपेक्षित आहे.


- राज्यातील महागाईचा दर नियंत्रणात असून एप्रिल ते डिसेंबर २०२५ या काळात चलनवाढ ग्रामीण भागासाठी २.० टक्के आणि नागरी भागासाठी १.५ टक्के होती. खाद्यपदार्थांच्या किमतींमधील वाढ तर एका टक्क्यापेक्षाही कमी राहिली आहे, असे आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Sugar hoarding : साखरेच्या साठेबाजीला आळा; केंद्र सरकारकडून स्टॉक लिमिट २ हजार क्विंटलवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर