Railway LPG Shortage : इंधन संकटाचा रेल्वे खानपान सेवेला फटका; वडापाव-समोसे मेन्यूमधून गायब होणार?

मुंबई : एलपीजीच्या सध्याच्या कमतरतेचा परिणाम रेल्वे स्थानकांमधील रेस्टॉरंट्सवर होऊ लागला आहे, अनेक खाद्यपदार्थ विक्रेत्यांना गॅस पुरवठ्यात घट झाल्यामुळे नियमित कामकाज सुरू ठेवण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे.


पश्चिम आशियातील तणावामुळे व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) सारख्या मोठ्या स्थानकांवरील खाद्यान्न स्टॉल्सवर वडापाव आणि समोसे मिळणे कठीण झाले आहे.



लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये ताज्या अन्नाऐवजी तयार पाकिटे :


आयआरसीटीसीच्या (IRCTC) शिवडी येथील क्लाउड किचनमधून दररोज मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ४,५०० प्रवाशांसाठी जेवण तयार केले जाते. मात्र, गॅसअभावी ताज्या अन्नाच्या उत्पादनावर मर्यादा आल्या आहेत. याचा परिणाम वंदे भारत, राजधानी आणि तेजस एक्सप्रेससारख्या प्रीमियम गाड्यांवर झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राजधानी एक्सप्रेससारख्या गाड्यांच्या पेंट्री कारमध्ये आता ‘रेडी-टू-ईट’ (Ready-to-Eat) अर्थात तयार अन्नाचा साठा ठेवला जात आहे. ताज्या जेवणाची कमतरता भासल्यास प्रवाशांना हे पर्याय दिले जातील.



मुंबई लोकलच्या प्रवाशांची मोठी गैरसोय :


मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्सवर तळलेले पदार्थ बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गॅसची गरज लागते. एलपीजी टंचाईमुळे आता वडापाव, समोसा आणि ब्रेड पकोडा यांसारखे लोकप्रिय पदार्थ गायब होण्याची चिन्हे आहेत. पश्चिम रेल्वेच्या ४६० हून अधिक आणि मध्य रेल्वेच्या १९४ स्टॉल्सवर ही समस्या जाणवत आहे. रेल्वे प्रशासनाने आता विक्रेत्यांना गॅसऐवजी इंडक्शन (Induction) आणि मायक्रोवेव्ह (Microwave) सारख्या विद्युत उपकरणांचा वापर करून अन्न गरम करण्याचे किंवा बनवण्याचे निर्देश दिले आहेत.

Comments
Add Comment

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर