Navnath Ban : महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचा जनतेनेच शाहिस्तेखान केला

- भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊत यांच्यावर प्रहार


मुंबई : महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांची बोटे छाटण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीतच केले असल्याचा घणाघात करत त्या निवडणुकांमध्ये भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आशीर्वाद देण्याचे काम जनतेने केले आहे. कधीकाळी राज्यातील मोठा पक्ष असलेल्या उबाठाने आपल्या पक्षाचा आत्मा सोडला असून ती कॉंग्रेसच्या वळचणीला गेल्याचा प्रहार भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत नवनाथ बन बोलत होते.


राजकारणातील संवेदनशीलतेबाबत बोलायचे तर या संवेदनशीलतेला नख लावण्याचे काम उबाठाने केले आहे. नारायण राणे, कंगना राणावत आणि मोहित कुंबोज यांचे घर पाडणे, व्यंगचित्र काढले म्हणून नौदल अधिकाऱ्याचा डोळा फोडणे, ही असंवेदनशीलतेचीच उदाहरणे आहेत. महाविकास आघाडीच्या राज्यातच केतकी चितळे तसेच पत्रकारांचा आवाज दडपण्यासाठी त्यांनाही अटक झाली तेव्हा संवेदनशीलतेवर बोलण्याचा अधिकार संजय राऊत यांनी कधीच गमावला आहे, अशी टीका बन यांनी केली.


बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीमध्ये कोणती भूमिका घ्यावी याबाबत उबाठा आणि संजय राऊत यांच्यात संभ्रम आहे. संजय राऊत यांनी आतापासूनच कॉंग्रेसची तळी उचलण्याचे धोरण अवलंबले आहे. आताच ते कॉंग्रेसचा उदो उदो करत आहेत. कारण आणखी काही वर्षांनी आपल्याला कॉंग्रेसमध्येच जायचे आहे हे त्यांनी ठरवलेलेच आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेते हर्षवर्धन सकपाळ, विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात अशा नेत्यांपेक्षा आपल्यालाच कॉंग्रेस अधिक कळते असे दाखवून संजय राऊत यांना राहुल गांधी यांना प्रभावित करायचे असल्याचे नवनाथ बन यांनी सुनावले.


भाजपाने नाती जपली नाहीत असा आरोप संजय राऊत करत आहेत. मात्र ज्यांनी स्वत:च्या भावाचे नाते जपले नाही त्यांनी भाजपाबद्दल बोलू नये. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेने उमेदवार दिला नव्हता. मात्र उबाठाने अमित ठाकरे यांच्या पहिल्याच निवडणुकीत त्यांच्याविरोधात उमेदवार उभा केला तेव्हा त्यांना नाती आणि परंपरा आठवली नाही का, असा सवाल बन यांनी केला.


महाविकास आघाडी म्हणजे तीन चाकी रिक्षा आहे, जिची तिन्ही चाके वेगवेगळ्या दिशांना जातात. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांमध्ये यातील घटक पक्षांचे एकमत होत नाही. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यातही कमालीचे मतभेद आहेत. गटबाजीचे राजकारण होत महाविकास आघाडी गटबाजीत गटांगळ्या खात असल्याची सणसणीत टीका नवनाथ बन यांनी केली.

Comments
Add Comment

Hindi Exam : सरकारी कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा शिकण्याची सक्ती करणारा निर्णय रद्द

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी ‘हिंदी भाषा

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यव्यापी शिबीर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे एक दिवसीय राज्यव्यापी शिबिर २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आल्याची

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांची भेट

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली