Metro-9 from Dahisar to Mira Bhayandar दहिसर ते मीरा भाईंदर 'मेट्रो-९'ला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू; वाहतूक कोंडीतून होणार सुटका


मुंबई : मुंबईच्या वेशीवर असलेल्या मीरा-भाईंदर शहराला जोडणारी महत्त्वाकांक्षी ‘मेट्रो-९’ मार्गिका अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. दहिसर (पूर्व) ते काशिगाव या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातून धावणारी ही पहिली मेट्रो सेवा ठरली असून, यामुळे दहिसर चेकनाक्यावरील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची मोठी सुटका होणार आहे.


दहिसर (पूर्व) मेट्रो स्थानक येथे आयोजित या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांच्यासह मेट्रो प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. लोकार्पणानंतर मुख्यमंत्र्यांनी नव्या मेट्रोतून प्रवास करत सुविधांचा आढावा घेतला.


मेट्रो मार्गिका ९ ही दहिसर (पूर्व) ते मीरा भाईंदर दरम्यान १०.५ किमी लांबीची उन्नत मार्गिका आहे. यातील पहिल्या टप्प्यात दहिसर ते काशिगाव दरम्यान ४.७ किमीचा मार्ग सुरू झाला आहे. यात दहिसर (पूर्व), पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशिगाव या चार स्थानकांचा समावेश आहे. या सेवेमुळे दहिसर टोल प्लाझा येथील वाहतूक कोंडी १० ते १५ टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, रस्त्यावरील साधारण २० ते ३० टक्के प्रवासी मेट्रोकडे वळल्यास पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ताण हलका होण्यास मदत होईल.



'मल्टी मोडल' प्रणाली


ही मेट्रो मार्गिका दहिसर (पूर्व) येथे मेट्रो-७ (दहिसर ते अंधेरी) आणि पुढे ७-अ (विमानतळ जोडणी) च्या माध्यमातून 'रेड लाईन'शी जोडली गेली आहे. यामुळे मीरा-भाईंदरमधील रहिवाशांना थेट मुंबई विमानतळापर्यंत अखंड प्रवास करणे शक्य होणार आहे. बस आणि ऑटोरिक्षा यांच्याशी असलेल्या 'मल्टी मोडल' एकात्मिकरणामुळे प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागणार नाही.



पर्यावरणपूरक आणि आधुनिक प्रवास


या मेट्रोमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग यंत्रणा जोडण्यात आली आहे. यामुळे गाड्यांच्या ब्रेकमुळे निर्माण होणारी ऊर्जा पुन्हा वापरली जाणार असून, यामुळे विजेची मोठी बचत होईल. इलेक्ट्रिक मेट्रोमुळे कार्बन उत्सर्जनात घट होऊन हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. स्थानकांवर लिफ्ट, सरकते जिने, सीसीटीव्ही यंत्रणा आणि दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष स्पर्शक्षम मार्गांची सोय करण्यात आली आहे. संपूर्ण प्रणालीवर रिअल-टाइम देखरेख ठेवण्यासाठी केंद्रीकृत नियंत्रण कक्ष कार्यरत राहील.

Comments
Add Comment

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर