Mumbai Metro 5 : भिवंडी शहरात पहिल्यांदाच धावणार मेट्रो; 'ऑरेंज मेट्रो लाइन ५' साठी नवी डेडलाईन जाहीर!

ठाणे : दहिसर-काशीगाव मेट्रोच्या यशानंतर आता ठाणे शहरात धावणाऱ्या 'ऑरेंज लाईन' मेट्रो ५ च्या कामाला मोठी गती मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या ठाणे-भिवंडी मेट्रो प्रकल्पासाठी आता नवी डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मेट्रोचे काम येत्या डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तांत्रिक चाचण्या आणि सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर, जानेवारी २०२७ मध्ये ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची दाट शक्यता आहे. या मेट्रोमुळे ठाणे आणि भिवंडीतील प्रवासाचा वेळ कमालीचा वाचणार आहे.



दहिसर-काशीगाव मेट्रोनंतर आता ठाणे-भिवंडी मेट्रोची प्रतीक्षा


नुकत्याच सुरू झालेल्या दहिसर-काशीगाव मेट्रोला प्रवाशांनी डोक्यावर घेतले असून, स्थानकांवर लागणाऱ्या रांगांवरून ठाणेकरांची मेट्रोची ओढ स्पष्ट झाली आहे. या पार्श्वभूमीवर, गेली अनेक वर्षे रखडलेल्या ठाणे-भिवंडी मेट्रोची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. सध्या या मार्गावर प्रवाशांना अनियमित बस सेवा आणि वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे. रेल्वेने प्रवास करायचा झाल्यास दिवा स्थानकावरून मोजक्याच 'मेमू' गाड्या उपलब्ध असल्याने प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे ठाणे-भिवंडी मेट्रो मार्ग तातडीने सुरू झाल्यास लाखो प्रवाशांना तासाभराच्या कोंडीतून आणि बसच्या विलंबातून मोठी मुक्ती मिळणार आहे.


मार्ग कसा असणार ?


ठाणे, भिवंडी आणि कल्याण या शहरांना जोडणाऱ्या २५ किमी लांबीच्या मेट्रो ५ (ऑरेंज लाईन) प्रकल्पाने आता वेग घेतला आहे. यातील पहिल्या टप्प्यात ठाणे ते भिवंडी दरम्यानचे काम प्राधान्याने पूर्ण केले जात आहे. सध्या भिवंडीतून मुंबईला जाण्यासाठी थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना ठाणे किंवा कल्याणमार्गे बसने प्रवास करावा लागतं. मात्र, मेट्रो सुरू होताच हा त्रास कायमचा संपणार आहे. भाजप आमदार महेश चौघुले यांच्या उपस्थितीत भिवंडी महापालिका आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच कामाची पाहणी केली. या पाहणीनंतर, तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात असून डिसेंबर २०२६ पर्यंत हा मार्ग पूर्णपणे तयार होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे ठाणे आणि भिवंडी दरम्यानचा प्रवासाचा वेळ निम्म्यावर येणार आहे.
Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : 'CJP म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, चार-पाच तरुण केवळ मोहरे'

पुणे : ‘सीजेपी’ या नावामागे केवळ छोटीशी संघटना नसून, हा ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Eknath Shinde : मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट

मुंबई : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त

India Semicon 2.0 Scheme : भारताची 1.27 लाख कोटींची सेमीकॉन योजना

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात चिप निर्मितीच्या संपूर्ण यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी 1.27 लाख कोटी रुपये