मे महिन्याच्या सुट्टीत भरणार गुरुजींची ‘शाळा’

नवशिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण; दुसरी ते चौथीच्या शिक्षकांना उपस्थिती बंधनकारक


मुंबई : उन्हाळ्याची प्रदीर्घ सुट्टी म्हणजे शिक्षकांसाठी हक्काच्या विश्रांतीचा आणि पर्यटनाचा काळ. मात्र, यंदा शिक्षकांच्या या सुट्टीवर विरजण पडण्याची चिन्हे आहेत. आगामी शैक्षणिक वर्षापासून लागू होणाऱ्या नव्या अभ्यासक्रमाचे धडे गिरवण्यासाठी शिक्षकांना मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात प्रशिक्षणाला सामोरे जावे लागणार असून, पर्यायाने यंदा गुरुजींची 'शाळा' सुट्टीतच भरणार आहे.



राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) हे पाऊल उचलले आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीचा नवा अभ्यासक्रम लागू होत आहे. या अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि शिकवण्याच्या नव्या पद्धती समजून घेण्यासाठी ४ मेपासून राज्यभर प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. १५ जून रोजी शाळांची घंटा वाजण्यापूर्वी सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागाने ठेवले आहे. 'एससीईआरटी'च्या सहसंचालिका डॉ. कमलादेवी आवटे यांनी यासंदर्भात परिपत्रक काढून प्रशिक्षणाला उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे.


हे प्रशिक्षण राज्य, जिल्हा आणि तालुका अशा तीन टप्प्यांत पार पडणार आहे. राज्यस्तरावर ४ ते ७ मे दरम्यान मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शिक्षकांसाठी पहिले सत्र होईल. पुढे ११ ते १४ मे दरम्यान जिल्हा स्तरावर प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर १८ ते ३० मे या शेवटच्या टप्प्यात तालुका स्तरावर शिक्षकांना प्रशिक्षित केले जाईल. विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसाहाय्यित शाळांतील शिक्षकांसाठीही हे प्रशिक्षण खुले ठेवण्यात आले आहे. मात्र, या शाळांमधील शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी शासनाकडून कोणतीही आर्थिक तरतूद केली जाणार नाही, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. परिणामी, अशा शाळांना आपल्या शिक्षकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागणार आहे. इयत्ता सहावीच्या प्रशिक्षणाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून, त्याबाबतच्या सूचना नंतर दिल्या जातील, असे 'एससीईआरटी'ने स्पष्ट केले आहे.



प्रशिक्षकांची फौज तयार होणार


राज्यस्तरावरील प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांची फौज तयार केली जात आहे. प्रादेशिक विद्या प्राधिकरण आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांना (डाएट) २० एप्रिलपर्यंत पात्र प्रशिक्षकांची नावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे प्रशिक्षक पुढे जिल्हा आणि तालुका स्तरावर शिक्षकांना मार्गदर्शन करतील. इयत्ता दुसरीसाठी ३ दिवस, तर तिसरी-चौथीसाठी ४ दिवसांचे प्रशिक्षण असेल. १५ जून २०२६ पूर्वी सर्व प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.