Maharashtra Weather : महाराष्ट्रात उष्णतेची लाट जोर धरणार; तर या राज्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळणार

मुंबई : हिवाळा संपला आणि उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. उन्हाचा पारा इतका चढलाय की उष्माघाताने लोक आपल्या जीवाला मुकत आहेत. काही दिवसांआधी पुण्यात हिंजवडी परिसरात गारा पडल्या आणि वातावरणात थंडावा निर्माण झाला. त्यानंतर पुन्हा उष्णतेचा पारा चढला तो अगदी ४० अंशापर्यंत जाऊन पोहोचला आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात वातावरण बदलाचा फटका जाणवत आहे. काही भागांमध्ये वादळी वारे आणि पाऊस आहे तर काही ठिकाणी वाढत्या उष्णतेमुळे पिकांची नासाडी झाली आहे.



हवामान विभागाचा इशारा


बदलत्या वातावरणावर हवामान विभागाने २१ एप्रिलपर्यंत अंदाज व्यक्त असून उष्णेतची लाट आणि दमट हवामानाचा इशारा दिला आहे. यानुसार महाराष्ट्रासह १३ राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


https://prahaar.in/2026/04/16/tcs-conversion-gang-used-to-inflict-torture-male-employee-makes-revelation-accused-said-send-wife-with-me/

या राज्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता


भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणि मांडलेल्या तारखांनुसार मध्य महाराष्ट्रात १६ ते १८ एप्रिल आणि मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिल दरम्यान लाट येण्याचा अंदाज आहे. १६ ते १९ एप्रिल दरम्यान मध्य प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, किनारपट्टीवरील कर्नाटक तसेच केरळ माहे येथे काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तसेच १६ ते १९ एप्रिल दरम्यान छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये लाट येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यात १६ ते २१ एप्रिल दरम्यान लाटेचा इशारा दिला आहे. तर गुजरात राज्याच्या किनारपट्टीतील भागांना देखील या उष्णतेचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.


भारतावर पश्चिमी वाऱ्यासह एका पश्चिमी प्रणाली सक्रिय असल्याने १६ एप्रिलच्या रात्रीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर एक नवीन परंतु कमकुवत पश्चिमी प्रणाली येण्याची शक्यता आहे. यामुळेच वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात कमल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याहची शक्यता आहे. मध्य, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेसह दमट हवामानाची शक्यता आहे.



या आठ राज्यांना आहे पावसाचा इशारा


मध्य महाराष्ट्रात १८ ते २१ एप्रिल दरम्यान ३० - ४० किमी वेगाने वारे वाहणार असून हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ईशान्य भारतातील आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये १६ ते १९ एप्रिल दरम्यान हलक्या पावसाची शक्यता असून ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हीच स्थिती नागालँड, मणिपूर, मिझोराम, आणि त्रिपुरामध्ये देखील राहणार आहे. यासोबतच राज्याच्या सर्व भागांमध्ये मुसळधार पावसासह गारपिठीचीही शक्यता असल्याने शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.