High Commissioner : माजी रेल्वे मंत्री झाले बांगलादेशमध्ये भारताचे उच्चायुक्त

नवी दिल्ली : देशाचे माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी आता बांगलादेशमध्ये भारताचे उच्चायुक्त झाले आहेत. त्यांनी प्रणय वर्मा यांच्याकडून बांगलादेशमधील भारताच्या उच्चायुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. प्रणय वर्मा आता ब्रुसेल्समध्ये युरोपीयन संघात भारताचे राजदूत म्हणून काम करणार आहेत.


दिनेश त्रिवेदी एकेकाळी तृणमूल काँग्रेसचे प्रभावी नेते होते. ते ममता बॅनर्जींचे विश्वासू म्हणून यूपीए सरकारच्या काळात १३ जुलै २०११ ते १८ मार्च २०१२ दरम्यान देशाचे रेल्वेमंत्री होते. पण रेल्वेमंत्री म्हणून त्यांनी घेतलेल्या निर्णयावरून वाद झाला. यानंतर दिनेश त्रिवेदी यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. हळू हळू त्यांचे तृणमूलमधील महत्त्व कमी होत गेले. अखेर १२ फेब्रुवारी २०२१ रोजी तृणमूलचा राजीनामा देऊन दिनेश त्रिवेदी बाहेर पडले. त्यांनी ६ मार्च २०२१ रोजी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. आता ७५ वर्षांचे असलेल्या यांनी बांगलादेशमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नवी जबाबदारी स्वीकारली आहे.


कोणत्याही देशात उच्चायुक्त, राजदूत अशा पदांवर परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्याची नियुक्ती होते. या पदावर एका ज्येष्ठ नेत्याची नियुक्ती करून केंद्र सरकारने बांगलादेश सोबतच्या राजकीय संबंधांना भारत विशेष महत्त्व देतो याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. बंगाली संस्कृतीची जाण असलेल्या दिनेश त्रिवेदी यांना बांगलादेशमध्ये उच्चायुक्त म्हणून काम करणे सोपे जाईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.


उच्चायुक्त नियुक्तीची माहिती मिळताच पश्चिम बंगालमधील भाजपचे सहप्रभारी अमित मालवीय यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आणि दिनेश त्रिवेदींचे नव्या जबाबदारीसाठी अभिनंदन केले.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Sugar hoarding : साखरेच्या साठेबाजीला आळा; केंद्र सरकारकडून स्टॉक लिमिट २ हजार क्विंटलवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर