BJP corporator Prakash Darekar : दहिसरच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारा

- दहिसरमध्ये कोकण भवन उभारा..


- भाजप नगरसेवक प्रकाश दरेकर यांची महापालिका अर्थसंकल्पात मागणी


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


शिवाजी महाराजांनी जनतेच्या कल्याणासाठी स्वराज्य उभे केले, तर डॉ. आंबेडकरांनी सर्वांना समान मतदानाचा अधिकार देऊन लोकशाही बळकट केली. या महामानवांच्या कार्याची आठवण चिरंतन कायम राहावी यासाठी दहिसर चेकनाक्याच्या प्रवेशद्वारावर त्यांचे भव्य पुतळे उभारावेत आणि परिसराचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक प्रकाश दरेकर यांनी महापालिका सभागृहात आपल्या अर्थसंकल्पीय भाषणांत केली. तसेच मुंबईत दहिसरमध्ये कोकण भवन उभारले जावे, अशी मागणी केली.


सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पावर महापालिका सभागृहात बोलतांना भाजप नगरसेवक प्रकाश दरेकर यांनी यावेळी त्यांनी स्थानिक पातळीवरील अनेक विकासकामांचे मुद्देही मांडले. दहिसर चेकनाक्याजवळ उभारलेल्या सात मजली इमारतीत हॉटेल सुरू करून पर्यटनाला चालना द्यावी, तसेच प्रस्तावित ट्रान्सपोर्ट हबच्या ठिकाणी अत्याधुनिक ट्रॉमा केअर रुग्णालय उभारावे, अशी सूचना त्यांनी केली. यामुळे अपघातग्रस्त आणि बाहेरून येणाऱ्या रुग्णांना त्वरित उपचार मिळू शकतील, असे त्यांनी नमूद केले. तसेच पाणी समस्येवर बोलताना दरेकर यांनी कोयना धरणाचे पाणी मुंबईत आणण्यासाठी प्रकल्प अहवाल तातडीने तयार करण्याची मागणी केली. पश्चिम उपनगरांना लोकसंख्येनुसार पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याचे सांगत त्यांनी हा अन्याय दूर करण्याचेही आवाहन केले.



कोयनेचे पाणी मुंबईत आणा :


कोयना धरणाचे पाणी मुंबईत आणण्याचा प्रयत्न व्हायला हवा,असे सांगत कोयनाचे पाणी मुंबईत आणण्यासाठीचा प्रकल्प अहवाल त्वरीत तयार करण्यात यावा. कोयनेचे पाणी मुंबईत आणण्यासाठी काय प्रयत्न केला जावा,अशी सूचना केली.



केतकीपाडा खदान येथे धरण उभारा..


सहा मल जल प्रक्रिया केंद्रातून तृत्तीयस्तर पाण्यावर प्रक्रिया करून त्यावर शुध्दीकरण करून त्याचा वापर पिण्यासाठी तसेच इतर पाणी पिण्याव्यतिरिक्त वापर करणार आहोत. मुंबईतील पाणी समस्या ही मोठी असून पश्चिम उपनगराची लोकसंख्या शहर आणि पूर्व उपनगरापेक्षा अधिक आहे, परंतु पाणी वितरणांमध्ये लोकसंख्या निहाय पाणी वाटप होत नाही. लोकसंख्या अधिक असूनही पश्चिम उपनगराला मुबलक पाणी पुरवठा होत नाही, याबाबत आपल्या पक्षाचे आमदार योगेशजी सागर यांचा प्रयत्न सुरु आहे. याबाबत राज्य शासनानेही समितीही गठित केली आहे. तरीही पश्चिम उपनगराला लोकसंख्येनुसार पाणी वाढवून मिळत नाही. त्यामुळे पश्चिम उपनगरातील आणि आम्ही शेवटच्या टोकाला असलेल्या दहिसरमधील नागरिकांवर अन्याय असल्याचेही त्यांनी मत मांडले.



बोरीवली दहिसर मध्ये व्हावे कोकण भवन :


महापालिका सभागृहात जवळपास ८० टक्के नगरसेवक कोकणातील आहेत. त्यामुळे मुंबईत कोकण भवन उभारले जावे ही प्रत्येक कोकणी माणसांची इच्छा आहे.आपल्या कोकणातील शेतकरी, उत्पादक, उद्योजक यांना थेट बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आंबा, काजू, मसाले आदींसह हातमाग उत्पादनांना त्याठिकाणी जागा उपलब्ध करून दिली जावी. यामाध्यमातून एकप्रकारे कोकणातील मेवा आणि उत्पादन यांना एकप्रकारे बाजारपेठ मिळेल तसेच या माध्यमातून मुंबईसारख्या ठिकाणी स्थिर व्यासपीठही मिळेल. त्यामुळे मुंबईत प्रायोगिक तत्वावर दहिसरमध्ये अशाप्रकारे कोकण भवन उभारले जावे. ज्यामुळे कोकण आणि मुंबई यांचा भावनिक व आर्थिक दुवा अधिक मजबूत करता येईल.



कौशल्य विकास केंद्र :


आजचा तरुण केवळ नोकरी शोधणारा नसून तो नोकरी निर्माण करणारा व्हावा, ही काळाची गरज आहे. दहिसर परिसरात कौशल्य विकास केंद्र उभारून तरुणांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण द्यावे. आयटी, डिजिटल मार्केटिंग, इलेक्ट्रिकल-मेकेनिकल ट्रेड्स, स्टार्टअप मार्गदर्शन अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देऊन आपण रोजगारक्षम पिढी तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल. आपले खासदार पियुषजी गोयल आणि आपले कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाजी यांच्या प्रयत्नाने कशाप्रकारची कौशल्य विकास केंद्र कांदिवलीमध्ये उभारली जात आहेत, तशीच आता बोरीवली आणि दहिसरमध्येही उभारली जावीत.



महिला औद्योगिक भवन :


महिलांना आर्थिक दृष्ट्या सबळ करणे हे केवळ घोषणांमधून न होता प्रत्यक्ष कृतीतून व्हायला हवे. महिला औद्योगिक केंद्र उभारुन त्याद्वारे आर्थिक सबळ करण्याचा प्रयत्न केला जावू शकतो. महिलांना उत्पादन प्रक्रिया, उद्योग, घरगुती व्यवसाय, स्वयं-साहाय्य गटांसाठी जागा व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हे आवश्यक आहे. यामुळे महिला आत्मनिर्भर होतील आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होईल, त्यामुळे अशाप्रकारे महिला औद्योगिक भवन आमच्या दहिसरमध्ये उभारण्याचा प्रशासनाने विचार करावा,अशी सूचना केली.

Comments

Chayya Balu Shinde    May 7, 2026 12:12 AM

Agdi barobar 👍👌 mhamanvanche vichar rujalech pahije 🙏🙏🙏🙏🙏

Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.