- पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराजीची चर्चा
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपतच राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहे. सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांकडून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी निर्णायक पावले उचलली जात असून, येत्या दिवाळीपूर्वी राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या संभाव्य फेरबदलाच्या हालचालींमुळे राजकीय वर्तुळात, विशेषतः विद्यमान मंत्र्यांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. (Maharashtra Cabinet)