Thalapathy Vijay : थलपती विजय ‘किंगमेकर’च्या शोधात!

चेन्नई : थलपती विजय यांच्या तमिलगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाने तमिळनाडूमध्ये इतिहास रचला. द्रविडी राजकारणाभोवती सत्ताखुर्चीचा खेळ करणाऱ्या द्रमुक आणि आण्णाद्रमुक यांना पछाडून विजय यांनी ऐतिहासिक विजय संपादन केला. टीव्हीके पक्षाने १०८ जागा जिंकल्या असल्या तरी पक्ष बहुमतापासून दूर आहे. सत्ता स्थापनेसाठी विजय यांना छोट्यामोठ्या पक्षांना बरोबर घ्यावे लागणार आहे. शिवाय युती सरकार स्थापन करण्यासाठी आता टीव्हीकेकडून काँग्रेसबरोबर बोलणी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.


थलपती विजय विरोधी पक्षांसोबत युती करण्याची योजना आखत आहे. टीव्हीके काँग्रेससह विदुथलाई चिरुथैगल कची, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग यांच्याशी युतीबाबत चर्चा करण्याची तयारी करत आहे. या पक्षांना लवकरच चर्चेसाठी निमंत्रण पाठवले जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तमिळनाडूमध्ये स्टॅलिन यांचा द्रमुक पुन्हा सत्ता स्थापन करेल असा अंदाज जवळपास सर्व संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला होता. पण, यावेळी द्रमुकला केवळ ५९ जागांपर्यंत मजल मारता आली. दरम्यान, याबाबत काँग्रेस खासदार शशिकांत सेंथिल यांना विचारण्यात आले असता, “तमिळनाडूचे हित, पक्षातील सर्वांची मतं विचारात घेऊन निर्णय घेईल”, असे त्यांनी म्हटले. “तमिळनाडूच्या निकालाचे सूक्ष्म विश्लेषण केले जाईल, पण राज्यातील जनतेने जो कौल दिला आहे तो आम्ही नम्रपणे स्वीकारतो”, असेही सेंथिल पुढे म्हणाले.


वरिष्ठ घेणार निर्णय : विजय यांच्या टीव्हीकेबरोबर असलेल्या मतभेदांबाबत सेंथिल यांना विचारले असताना त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची चर्चा करण्याची गरज बोलून दाखवली. पक्षात अनेक मतमतांतरे आहेत. आम्हाला पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी लागेल. आम्ही संधीसाधू नाही. आमची विचारधारा आणि नागरिकांना दिलेल्या आश्वासनांशी आम्ही प्रामाणिक आहोत, अशी भूमिका सेंथिल यांनी मांडली. केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय घेईल, तो तमिळनाडूच्या जनतेच्या हिताचा निर्णय घेईल, असेही त्यांना स्पष्ट केले.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : 'CJP म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, चार-पाच तरुण केवळ मोहरे'

पुणे : ‘सीजेपी’ या नावामागे केवळ छोटीशी संघटना नसून, हा ‘काँग्रेस जिताओ प्रोग्राम’ असल्याचा आरोप मुख्यमंत्री

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक

नवी दिल्ली : 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य

Eknath Shinde : मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट

मुंबई : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त

India Semicon 2.0 Scheme : भारताची 1.27 लाख कोटींची सेमीकॉन योजना

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात चिप निर्मितीच्या संपूर्ण यंत्रणेला प्रोत्साहन देण्यासाठी 1.27 लाख कोटी रुपये