नाशिक: काळाराम मंदिरात धर्मध्वज स्थापना; रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत धर्मध्वज उभारणार

नाशिक : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, पंचवटीतील श्री काळाराम संस्थानच्या वतीने आज ४.४४ वाजता धर्मध्वज स्थापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे यांची उपस्थिती राहणार आहे.


धर्मध्वज स्थापना कार्यक्रमास सकाळपासून सुरुवात झाली असून दुपारी चारपर्यंत विधीवत पूजन होईल. यासाठी प्रधान आचार्य म्हणून महंत सुधीरदास महाराज, पौराेहित्य शांताराम भानोसे, पं. दिनेश गायधनी करणार आहेत. पुरातन ध्वज १९६२ साली मंदिरात स्थापित झाला होता. वातावरणातील बदलाने सद्यस्थितीत तो जीर्ण अवस्थेत असल्याने धर्मध्वजारोहण होत आहे. जवळपास काळाराम मंदिरात ६४ वर्षांनंतर नवा धर्मध्वज उभारण्यात येणार आहे.


 



 

६४ वर्षांनंतर नवा धर्मध्वज उभारण्यात येणार


श्री काळाराम मंदिर देवस्थानाचा (Shri Kalaram Temple Devasthan) प्राचीन धर्मध्वज जीर्ण झाल्याने भव्य स्वरूपात धर्मध्वज उभारण्यात येणार आहे. १९६२ साली धर्मध्वज उभारण्यात आला होता. वातावरणातील बदलामुळे तो जीर्ण झाला आहे. धर्मस्तंभ (ध्वजस्तंभ) अयोध्या येथील नमुन्यावर तसेच धर्मशास्त्रावर आधारित असून सुमारे २१ फूट उंचीचा पितळी (ब्रास) स्तंभ असेल. धर्मध्वज हा भगवा (केशरी) रंगाचा असून त्याचे परिमाण अंदाजे पाच फूट बाय ११ फूट असेल; या ध्वजावर भगवान हनुमानाची प्रतिमा तसेच जय श्रीराम, ॐ आणि चिन्ह अंकित केलेले आहे. धर्मध्वज स्थापना ही भारतीय सनातन संस्कृतीतील परंपरा असून धर्म, सत्य, शौर्य व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी आहे; यानिमित्ताने वेदघोष, पूजन-विधी व धार्मिक अनुष्ठानांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष अक्षय कलंत्री यांनी दिली.


दरम्यान, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Former President Ram Nath Kovind) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर हिमगौरी आडके (Mayor Himgauri Adke), पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Police Commissioner Sandeep Karnik), जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Collector Ayush Prasad) यांनी मंदिराला भेट देत पाहणी करुन सुरक्षेचा आढावा घेतला.


 



 

काळाराम मंदिर


नाशिकच्या पंचवटीतील काळाराम मंदिर हे १७८२ मध्ये सरदार रंगराव ओढेकर यांनी काळ्या पाषाणात उभारलेले भगवान श्रीरामाचे ऐतिहासिक आणि जागृत मंदिर आहे. गोदावरी नदीच्या काठावर, प्रभू राम वनवासात राहिले होते, त्या ठिकाणी हे मंदिर आहे. येथे राम, सीता आणि लक्ष्मणाच्या काळ्या मूर्ती आहेत, तसेच हे मंदिर सामाजिक सुधारणांचा साक्षीदार आहे. हे मंदिर नाशिकच्या पंचवटी भागात स्थित आहे.


जुन्या लाकडी मंदिराच्या जागी १७८२ मध्ये पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर बांधले, ज्यासाठी सुमारे १२ वर्षे लागली. मंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात (Black stone) केलेले आहे. हे १८ व्या शतकातील उत्कृष्ट वास्तुकलेचे उदाहरण मानले जाते. गर्भगृहात प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. रामनवमी हा येथील सर्वात मोठा उत्सव आहे, जो चैत्र महिन्यात साजरा केला जातो.

Comments
Add Comment

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

ITR Filing 2026 : देशात आयटीआर भरणाऱ्यांचा विक्रमी आकडा; ७.८ कोटींचा टप्पा पार

नवी दिल्ली : देशात आयकर रिटर्न (आयटीआर) दाखल करणाऱ्यांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. मूल्यांकन वर्ष

Chandrashekhar Bawankule : अर्थसंकल्पातील मंजूर निधी ओबीसी मंत्रालयाला द्या; ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी

ओबीसी महामंडळांचे प्रश्न डिसेंबरपर्यंत मार्गी परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संख्या वाढविणार बैठकीत १३

Russia Ukraine War : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीयासह १२ जणांचा मृत्यू

कीव्ह : रशियाने युक्रेनवर रात्रभर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा आणि इतर ११ जणांचा अशा एकूण १२