Uddhav Thackeray : उबाठा प्रमुखांची विधान परिषदेत महा'दांडी'!

- ४ वर्षांत केवळ ४२ दिवस हजेरी; सभागृहाच्या इतिहासात सर्वात कमी उपस्थितीचा लाजिरवाणा विक्रम नोंद


मुंबई : मुख्यमंत्री असताना 'वर्क फ्रॉम होम' करत केवळ फेसबुक लाईव्ह पुरतेच मर्यादित राहिलेले 'उबाठा' प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा अकार्यक्षम आणि बेजबाबदार कारभार आता अधिकृत आकडेवारीसह चव्हाट्यावर आला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेत सर्वात कमी उपस्थित राहण्याचा एक नवा लाजीरवाणा विक्रम माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना बगल देत ठाकरे सभागृहात केवळ ४२ दिवसच फिरकले, त्यांची उपस्थिती जेमतेम ३१.५८ टक्के इतकीच होती. २२ जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच उबाठा प्रमुखांचे हे सुमार 'प्रगतीपुस्तक' समोर आल्यामुळे उबाठा गटाची प्रचंड नाचक्की झाली आहे.



उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ नुकताच म्हणजेच १३ मे २०२६ रोजी संपला. २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे अनैसर्गिक सरकार स्थापन करून मुख्यमंत्री बनलेले उद्धव ठाकरे २०२० मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले होते. मात्र, २०२२ मध्ये जवळपास ४० आमदारांनी त्यांच्या नेतृत्वाला कंटाळून उठाव केला आणि त्यांना सत्तेवरून खाली खेचले. मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) असताना ते मंत्रालयात आणि विधिमंडळात कधी जातच नव्हते. मात्र, मुख्यमंत्री पद गेल्यानंतर तरी ते आमदार म्हणून लोकांचे प्रश्न मांडतील, अशी अपेक्षा होती. परंतु, समोर आलेल्या आकडेवारीने त्यांच्या अकार्यक्षम वृत्तीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.



१३३ पैकी तब्बल ९१ बैठकांना गैरहजर :


जून २०२२ मध्ये मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत झालेल्या विधानपरिषदेच्या एकूण १३३ बैठकांपैकी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केवळ ४२ बैठकांनाच हजेरी लावली आहे, तर तब्बल ९१ बैठकांमध्ये ते अनुपस्थित राहिले. मुख्यमंत्री पद गेल्यानंतर झालेल्या पहिल्याच पावसाळी अधिवेशनात तर त्यांनी केवळ एकदाच तोंड दाखवले. एवढेच नव्हे तर, नुकत्याच पार पडलेल्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील १६ बैठकांपैकी ते केवळ चार बैठकांना उपस्थित होते. जनतेच्या प्रश्नांशी आणि सभागृहाच्या कामकाजाशी आपल्याला काहीही देणेघेणे नाही, हेच उबाठा प्रमुखांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.



कोणाची किती उपस्थिती?


अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी ६ वर्षांच्या कार्यकाळात ९६.५० टक्के उपस्थिती लावून सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याशिवाय शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आणि काँग्रेसचे राजेश राठोड यांनी ९३ टक्क्यांहून अधिक बैठकांना हजेरी लावली. विशेष म्हणजे, अमोल मिटकरी आणि राजेश राठोड यांनी आपल्या १८ पैकी १३ अधिवेशनांमध्ये १०० टक्के उपस्थितीचा विक्रम केला आहे. (Uddhav Thackeray)

Comments
Add Comment

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

ITR Filing 2026 : देशात आयटीआर भरणाऱ्यांचा विक्रमी आकडा; ७.८ कोटींचा टप्पा पार

नवी दिल्ली : देशात आयकर रिटर्न (आयटीआर) दाखल करणाऱ्यांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. मूल्यांकन वर्ष

Chandrashekhar Bawankule : अर्थसंकल्पातील मंजूर निधी ओबीसी मंत्रालयाला द्या; ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी

ओबीसी महामंडळांचे प्रश्न डिसेंबरपर्यंत मार्गी परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संख्या वाढविणार बैठकीत १३

Russia Ukraine War : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीयासह १२ जणांचा मृत्यू

कीव्ह : रशियाने युक्रेनवर रात्रभर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा आणि इतर ११ जणांचा अशा एकूण १२