नसरापूरप्रकरणी २१ मेपासून विशेष न्यायालयात सुनावणी

पुणे : नसरापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी पुणे येथील विशेष न्यायालयात २१ मेपासून नियमित सुनावणी सुरू होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या खटल्याचे गांभीर्य आणि पीडितेचे वय लक्षात घेऊन ही सुनावणी इन कॅमेरा पद्धतीने घेतली जाणार आहे. जिल्हा न्यायाधीश व विशेष सत्र न्यायाधीश एस आर साळुंखे यांच्या विशेष न्यायालयात कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही कायदेशीर प्रक्रिया पार पडेल. ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने अवघ्या १४ दिवसांत तब्बल ११०० पानांचे भक्कम दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. हे दोषारोपपत्र सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक रिपोर्ट, वैद्यकीय अहवाल आणि पीडितेला आरोपीसोबत शेवटचे पाहिल्याचा साक्षीदारांचा पुरावा यावर आधारलेले आहे.



विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सांगितले की या तपासात उच्च दर्जाची तांत्रिक पद्धत अवलंबून तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्यात आला आहे. खटल्याच्या सुरुवातीलाच न्यायालयाने घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करावी अशी विनंती ॲड अजय मिसर यांच्यामार्फत करण्यात आली आहे. हा खटला विक्रमी वेळेत पूर्ण करून आरोपीला कठोर शासन मिळवून दिले जाईल आणि पीडितेच्या कुटुंबाला न्याय दिला जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
Comments
Add Comment

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :

Ravindra Chavan : भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत रविंद्र चव्हाणांचे कार्यकर्त्यांना मोठे आवाहन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा