बीड भूसंपादन घोटाळ्यातील जिल्हाधिकाऱ्याचे अखेर निलंबन

मुख्यमंत्र्यांचे निर्देश; वाढीव मोबदल्याआडून शासनाची ७३ कोटींची फसवणूक


मुंबई : बीड जिल्ह्यातील बहुचर्चित राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर राज्य शासनाने ही कारवाई केली असून, अटकेच्या तारखेपासून हे निलंबन लागू करण्यात आले आहे. या महाघोटाळ्यात मागच्या तारखांचे बनावट आदेश तयार करून शासनाची तब्बल ७३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका पाठक यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी ७ मे रोजी लातूर येथून अविनाश पाठक यांना अटक करण्यात आली होती. फौजदारी गुन्ह्यात ४८ तासांपेक्षा जास्त काळ कोठडीत असलेल्या शासकीय अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या नियमानुसार, राज्य सरकारने आता हे निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. निलंबन काळात पाठक यांचे मुख्यालय बीड हेच निश्चित करण्यात आले आहे.


नेमके प्रकरण काय?

राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला बेकायदेशीरपणे वाढवून देण्यासाठी हा संपूर्ण कट रचला गेला होता. अविनाश पाठक यांची २२ एप्रिल २०२५ रोजी बीडच्या जिल्हाधिकारी पदावरून बदली झाली होती. मात्र, त्यानंतरही त्यांच्या कार्यकाळातील मागच्या तारखा (१ मार्च ते १७ एप्रिल २०२५) वापरून वाढीव मोबदल्याचे नस्ती (फाईल) आदेश तयार करण्यात आले.या मागच्या तारखेतील आदेशांद्वारे १५४ प्रकरणांमधील जमिनीचा मोबदला तब्बल २४१ कोटी ६२ लाख रुपयांनी वाढवून दाखवण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, महसूल प्रशासनातील कोणतीही अधिकृत नोंदवही (रजिस्टर) न ठेवता, यातील ७३ कोटी ४ लाख रुपयांचे खातेदारांना वाटपही करण्यात आले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महसूल कर्मचारी आणि वकिलांसह एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईतील नारळाच्या झाडांपासून धोका

संरक्षण जाळ्या बसविण्याची भाजप नगरसेवक अ‍ॅड मकरंद नार्वेकर मागणी मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : रस्त्यालगत असलेल्या

Fire Officer Uniform Cost : अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ७० हजारांचा गणवेश

पी पी पी गणवेशकरता तब्बल १६ कोटीचा खर्च! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील आगींसह विविध आपत्कालीन परिस्थितीत जीव

Mumbai Water Quality : मुंबईच्या पाणीपुरवठ्याची गुणवत्ता सुधारतेय!

- दूषित पाण्याचे प्रमाण ०.४६ वरून ०.२८ टक्क्यांवर; तीन वर्षांच्या आकडेवारीत घट - एच-पूर्व विभागात सर्वाधिक ३.११

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.