Monsoon 2026 : दिलासादायक! येत्या ४८ तासांत केरळमध्ये पाऊस बरसणार; महाराष्ट्रासह 'या' राज्यांना पाऊस झोडपणार! IMD चा अंदाज काय ?

मुंबई : उन्हाच्या तीव्र झळा आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी अखेर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. बहुप्रतीक्षित नैऋत्य मान्सून (Monsoon Alert)  (Monsoon 2026) आता अगदी उंबरठ्यावर येऊन पोहोचला असून, येत्या ४८ तासांत म्हणजेच ४ जूनच्या आसपास तो केरळमध्ये अधिकृतपणे दाखल होणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी सध्या देशात अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. केरळसह लक्षद्वीप आणि तामिळनाडूच्या आणखी काही भागांमध्ये मान्सूनची आगेकूच वेगाने सुरू असून, लवकरच पावसाचा वर्षाव सुरू होईल.



अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनची जोरदार घोडदौड


हवामान खात्याने स्पष्ट केले आहे की, मान्सूनचा प्रवास आता केवळ केरळ पुरता मर्यादित राहिलेला नाही. अरबी समुद्राच्या नैऋत्य आणि आग्नेय भागात मान्सूनने आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, बंगालच्या उपसागरातील पश्चिम-मध्य, पूर्व-मध्य आणि ईशान्य भागांतही मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. आग्नेय बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागांमध्येही ४ जूनपर्यंत मान्सूनचे ढग दाटून येतील. हवामान खात्याने मंगळवारी जारी केलेल्या पत्रकानुसार, अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत मान्सूनचा विस्तार होण्यासाठी परिस्थिती पूर्णपणे पोषक आहे.



केरळ आणि कर्नाटकात 'ऑरेंज अलर्ट'


मान्सूनच्या आगमनासोबतच दक्षिण भारतात पावसाचा जोर प्रचंड वाढणार आहे. आयएमडीच्या (IMD) अंदाजानुसार, पुढील ६ ते ७ दिवसांत केरळमध्ये विखुरलेल्या स्वरूपात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो. काही भागांत ७ ते २० सेंटीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. केरळच्या सोबतीनेच तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यांतही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या संपूर्ण आठवड्यात उत्तर-पश्चिम, मध्य, पूर्व भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारताच्या काही भागांमध्ये ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट पाहायला मिळेल.



'टायफून' आणि चक्रीय वाऱ्यांमुळे मान्सूनच्या सुरुवातीला ब्रेक ?


आयएमडीच्या 'विस्तारित श्रेणी अंदाजा'नुसार (Extended Range Forecast), २८ मे ते ४ जून या काळात केरळमध्ये प्रामुख्याने हवामान कोरडे राहिले होते आणि ४ जूननंतर त्यात अतिशय संथ गतीने सुधारणा होईल. या संथ गतीमागे एक मोठे जागतिक हवामान बदलाचे कारण आहे. सध्या पश्चिम पॅसिफिक महासागरावर एक तीव्र 'टायफून' सक्रिय आहे. हे वादळ अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील बाष्प (Ocen Moisture) मोठ्या प्रमाणात स्वतःकडे खेचून घेत आहे. त्यातच लक्षद्वीप क्षेत्रावर निर्माण झालेल्या चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीमुळे (Cyclonic Circulation) मान्सूनचे आगमन काहीसे उशिरा झाले असून, त्याची सुरुवातीची वाटचाल कमकुवत राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता


आनंदाच्या बातमीसोबतच हवामान खात्याने एक चिंताजनक आकडेवारीही जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात भारतीय हवामान विभागाने (IMD) आपल्या हंगामी पर्जन्यमानाच्या अंदाजात सुधारणा करत तो खाली आणला आहे. एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या 'दीर्घकालीन सरासरीच्या' (LPA) ९२ टक्क्यांवरून हा अंदाज आता ९० टक्क्यांवर आणण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, यंदा पावसाळ्यात 'पावसाची तूट' (Deficient Monsoon) असण्याची शक्यता तब्बल ६० टक्के आहे. एकूण पर्जन्यमान 'सामान्यपेक्षा कमी' (Below-Normal) राहण्याची शक्यता ५० टक्क्यांहून अधिक असल्याने, शेतकऱ्यांना आणि प्रशासनाला पाण्याचा वापर अत्यंत नियोजित पद्धतीने करावा लागणार आहे.

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी